Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याने पुन्हा उपोषण; जरांगे पाटील यांनी मांडली भूमिका

लक्ष्मण सोळुंके

जालना : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने (Maratha Reservation) आश्वासन देऊनही आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केल्या नाही. यामुळे पुन्हा बेमुदत उपोषण (Jalna News) सुरू करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. (Tajya Batmya)

जालना येथे आजपासून पुन्हा उपोषण सुरु केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने २ दिवसांत आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ; असं आश्वासन दिले होते. ते पण पाळल नाही. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना मदत केली नाही. सभेच्या दिवशी शेतीचे नुकसान झालं त्याचे पंचनामे केले नाही. लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात शांततेत आंदोलन करा

१९६७ आणि १९९० ला जे निकष लावून (Manoj Jarange Patil) आरक्षण दिलं तेच निकष लावून आम्हाला आरक्षण द्या. पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या कायद्यानुसार आरक्षण द्या; अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात २ हजार १२ गावपेक्षा अधिक गावात नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आल्याची आकडेवारी जरांगे यांनी जाहीर केली. महाराष्ट्रात शांततेनं आंदोलन करा असंही जरांगे पाटील म्हणाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT