Jalna News Child Missing Case
Jalna News Child Missing Case Saam tv
महाराष्ट्र

Child Missing Case: त्या बेपत्ता मुलांचा लॅपटॉपमुळे लागला शोध; शिर्डीतील खाजगी भक्त निवासात होती तिन्ही मुले

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना शहरातून ३ लहान मुलं बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती. बेपत्ता झालेले तिनही मुलं (Jalna News) चांगले मित्र आहेत. अखेर या मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. ही तिघंही मुलं शिर्डीतील (Shirdi) एका खाजगी निवासातून ताब्यात घेण्यात आली आहेत. (Tajya Batmya)

जालना शहरातून अंकित जाधव (वय १५), स्वराज मापारी (वय १४) आणि हर्षद देवकर (वय १४) अशी बेपत्ता झालेल्या तिन्हीही मुलांची नावं होती. यातील एकाने चिट्ठी लिहून घर सोडलं होतं. तर दुसऱ्याने स्नॅपचॅटवर घरच्यांना मॅसेज केला होता. तीन मुले एकाचवेळी गायब झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलिस उपअधीक्षक सचिनबापू सांगळे यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत संवेदनशीलपणे हाताळत सायबर यंत्रणा आणि कदीम जालना पोलीसांना कामाला लावले होते.

लॅपटॉपमुळे लागला शोध 

बेपत्ता मुले शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने तब्बल ४८ तास शर्थीचे प्रयत्न केले. ही तिघेही मुलं शिर्डी येथे एका खाजगी भक्त निवासातील एक खोलीत थांबलेले असतांना त्यांना आज सकाळी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे आणि अंमलदार रामेश्वर राऊत यांच्या टीमने ताब्यात घेतली आहेत. या मूलांजवळ असलेल्या लॅपटॉपमुळे त्यांचा शोध घेण्यासाठी मदत झाली. उपनिरीक्षक नागरे हे तिन्ही मुलांना सोबत घेऊन जालन्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुलं मिळाले असल्याचा निरोप पोलीस अधीक्षक यांना येताच मुलांच्या आईवडिलांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CAA अंतर्गत 14 लोकांना मिळालं भारतीय नागरिकत्व, गृह मंत्रालयाने दिली माहिती

Pune News: पुणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका, १ कोटी ७९ लाखांचा दंड ठोठावला

Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण

Manjra Dam : मांजरा धरणात आता १० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; अनेक भागात मोठ पाणीसंकट

UBT Vs INC : मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अनिल देसाईंना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला विरोध?

SCROLL FOR NEXT