Kharif Season Saam tv
महाराष्ट्र

Kharip Hangam : कृषी केंद्राची तपासणी मोहीम; बोगस बियाणं, वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

Jalna News : खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे. यामुळे बियाणे विक्रीला सुरवात झाली आहे. या दरम्यान काही विक्रेते बोगस बियाणे विक्री करत असतात. तर काही जण वाढीव दराने बियाणांची विक्री करतात.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

जालना : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खत तसेच शेतीसाठी आवश्यक औषधीची वाढीव दराने विक्री होऊ नये; म्हणून जिल्हा कृषी विभागात सज्ज झाला आहे. यासाठी पथके नेमण्यात आली असून कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहीम आता हाती घेण्यात आली आहे. 

खरीप हंगाम (Kharip Hangam) अगदी तोंडावर आहे. यामुळे बियाणे विक्रीला सुरवात झाली आहे. या दरम्यान काही विक्रेते बोगस बियाणे विक्री करत असतात. तर काही जण वाढीव दराने बियाणांची विक्री करतात. या दृष्टीने कृषी विभागाकडून (Agriculture Department) तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. कुणीही वाढीव दराने बियाणे खत विक्री केल्यास त्या दुकानदारावर सक्त कारवाई करणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडीगोद्री आणि शहागड येथील कृषी सेवा केंद्राच्या तपासणी मोहिमेला सुरुवात झाली असून पूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान यंदा खरीप हंगाम अगदी १० ते १२ दिवसावर येऊन ठेपल्याने दुकानदार बी बियाणांची, खते आणि औषधांची खरेदी सुरू करून स्टॉक करतात. नंतर वाढीव दराने (farmer) शेतकऱ्यांना विकतात. मात्र याला लगाम लावण्यासाठी कृषी विभाग आता चांगलाच ॲक्शन मोडवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT