Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

उष्माघाताने एकाचा मृत्यू; कामाच्‍या शोधात गाठले होते जळगाव

उष्माघाताने एकाचा मृत्यू; कामाच्‍या शोधात गाठले होते जळगाव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगावचे तापमान दरवर्षी रेकॉर्डब्रेक असते. गेल्या दोन वर्षात उष्माघाताच्या घटनांना कोरोनानिमित्त लावलेल्या संचारबंदीमुळे ब्रेक लागला होता. यंदा मात्र उष्माघाताने मार्च महिन्यात एक आणि त्यानंतर आता दुसरा मृत्यू (Death) झाला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news high temperature One dies of heatstroke)

धरणगाव (Dharangaon) येथील रहिवासी किशोर खलपे (वय ३७) गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील हरिविठ्ठलनगरात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आले होते. गुरुवारी (ता. २६) दिवसभर उन्हातच काम केल्याने त्यांना त्रास जाणवत होता. अशातच सायंकाळी ते हरिविठ्ठलनगरातील रिक्षा स्टॉपजवळ चक्कर येऊन कोसळले. परिसरातील नागरिकांसह नातेवाइकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या अंदाज व्यक्त होत असून तशी नोंद रामानंदनगर पोलिस (Police) ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार उषा सोनवणे या करीत आहे.

तीन लेकरं झाली अनाथ

साधारणत: तीन वर्षांपूर्वीच किशोर खलपे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून तीन अपत्ये वडिलांसोबतच राहत होते. कामानिमित्त ते धरणगाव सोडून जळगावात आले होते. परंतु येथे उष्माघाताने त्यांचा बळी घेतल्याने त्यांच्या पश्चात आता मुलं पोरकी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भावली धबधबा पर्यटक मारहाण आणि विनयभंग प्रकरण, ९ आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

जेवणासोबत तोंडी लावायला बनवा कुरकुरीत सुरणाचे काप, सोपी आहे रेसिपी

Devendra Fadnavis: ४८ हजार कोटीचं वीजबिल माफ अन् दिवसा १०० टक्के वीज; कर्जमाफीनंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळबळ

रात्री कोणत्या दिशेला डोके करून झोपावे?| Sleeping Position

SCROLL FOR NEXT