गॅस तुटवड्यावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. देशातील गॅस तुटवड्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या टीकेला मंत्री पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी प्रत्युत्तर दिलं. हरदीप पुरी यांनी सांगितलं की, 'भारतात तेलाचा पुरवठा सुरक्षितरित्या होत आहे. होर्मुजमधून केवळ २० टक्के दळणवळण प्रभावित झालं आहे. देशात गॅसचा पर्यायी साठा आहे. गॅस तुटवड्यावर चिंता करण्याची गरज आहे'.
'डीजल-पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. एलएनजी कार्गो दररोज येत आहेत. ते दुसऱ्या मार्गाने येत आहे. सीएनजी पुरवठा १०० टक्के होत आहे. कॅनडा, नॉर्वे, रशिया या मार्गातून इंधन पुरवठा होत आहे, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले.