शेतकऱ्याची आत्‍महत्‍या 
महाराष्ट्र

सलग दुसऱ्या दिवशी कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्‍महत्‍या

सलग दुसऱ्या दिवशी कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्‍महत्‍या

Rajesh Sonwane

जळगाव : पावसाचा अनियमितेमुळे शेतातून उत्‍पन्‍न येत नाही. यातच यंदा अतिवृष्टीमुळे उत्पन्न मिळणार नसल्याचे चित्र दिसत असून, डोक्‍यावर कर्जाचा बोजा आहे. या तणावातून पथराड (ता.धरणगाव) येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. (jalgaon-news-dharangaon-taluka-Debt-ridden-farmer's-suicide)

पथराड (ता. धरणगाव) येथील किशोर सुरेश जाधव (वय ४४) हे सोमवारी रात्री घरातील कडी लाऊन झोपले. आज सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी किशोर यांना आवाज दिल्यावर दरवाजा उघडत नाही शिवाय आतून प्रतिसाद मिळत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला. यावेळी किशोर जाधव हे विषारी किटकनाशक औषध पिऊन पडलेल्‍या अवस्‍थेत आढळून आले. त्‍यांना दवाखान्‍यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पिक झाले खराब

किशोर जाधव यांच्याकडे तीन बीघे शेती आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिक खराब झाल्‍याने कर्ज आहे. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असे ग्रामस्थांमध्‍ये चर्चा होती. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'टिकली' ड्रग्जचा विद्यार्थ्यांना विळखा, नागपूरच्या कॉलेजेसमध्ये 'LSD'चा धुमाकूळ

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT