Jalgaon school open
Jalgaon school open Jalgaon school open
महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात वाजली शाळांची घंटा; ३०६ गावातील शाळांमध्‍ये भरले वर्ग

Rajesh Sonwane

जळगाव : शासन निर्णयानुसार जळगाव जिल्‍ह्यातील माध्‍यमिक विभागाच्‍या शाळा सुरू झाल्‍या आहेत. ग्रामीण भागातील ७०८ शाळांपैकी ३०६ गावांकडून शाळा सुरू करण्याबाबत ठराव प्राप्‍त होते. त्‍यानुसार आज प्रत्‍यक्षात ३०६ शाळांमध्‍ये वर्ग भरले होते. (jalgaon-district-306-school-open-today-after-coronavirus)

शासनाने १५ जुलैपासून राज्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संबंधित गावांमधील ग्रामपंचायतींनी ठराव करणे आवश्यक होता. जिल्ह्यात ७०८ माध्यमिक शाळा असलेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन केले होते. त्यापैकी काही शाळांबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव केले असल्याने आज शाळा सुरू झाल्या.

३०६ शाळांची घंटा वाजली

माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी माध्यमिक शाळांना ग्रामपंचायतींचा ठराव आवश्यक होता. जिल्ह्यातील ७०८ शाळा सुरू करण्यासाठी संबंधित शाळांना सुचना दिल्या होत्‍या. मात्र शासन निर्देशानुसार ग्रा.पं.चे ठराव घेण्यानुसार केवळ ३०६ ग्रामपंचायतींचे ठराव प्राप्‍त होते. यामुळे आज कोरोना नियमांचे पालन करत प्रत्‍यक्षात ३०६ शाळा भरल्‍या. काही शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्‍हती. पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असून, नंतर हळूहळू विद्यार्थी संख्या वाढेल असे शिक्षकांनी सांगितले.

गेटवर स्‍वागत अन्‌ शिकविणे सुरू

शाळांमध्‍ये विद्यार्थी आल्‍यानंतर कोरोना नियमांचे पालन करत प्रवेश देण्यात आला. तसेच गेटवर विद्याथ्‍र्यांचे स्‍वागत करण्यात आले. यानंतर आठवी ते दहावीच्‍या वर्गांमध्‍ये शिक्षकांनी शिकविण्यास सुरवात केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT