Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : मध्यरात्री नागरिक सतर्क झाले अन् ३५० जणांचा जीव वाचला

Hingoli News मध्यरात्री नागरिक सतर्क झाले अन् ३५० जणांचा जीव वाचला

संदीप नागरे

हिंगोली : पावसाळा सुरू झाला की दरड कोसळणे, भुसक्कलन होणे अश्या नैसर्गिक आपत्ती घडून नागरिकांचे बळी जाण्याच्या घटना घडतात, मात्र हिंगोलीच्या वसमत शहरात पालिकेच्या दुर्लक्षाने हजारो नागरिकांच्या जीवावर जी परिस्थिती बेतली ती अंगावर काटा आणणारी आहे. (Tajya Batmya)

धरणामधून पाण्याचा विसर्ग व्हावा, असेच काहीसे चित्र वाटणारा हा पाण्याचा खळखळाट कुठल्या धरणाचा नाही तर वसमत शहराच्या मधोमध असलेल्या पालिकेच्या ताब्यातील फुटलेल्या तलावाचा आहे. वसमत शहराच्या व पालिकेच्या सौंदर्यात नेहमी भर घालणाऱ्या या तलावाचं वसमत पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी नेहमी भरभरून कौतुक करतात. मात्र या तलावाच्या डागडूजीकडे मागच्या अनेक वर्षात कुणीही लक्ष न दिल्याने काल या तलावाला मोठे भगदाड पडले. काल मध्यरात्री या तलावाचा बांध फुटला आणि तलावाच्या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीवितवाला धोका निर्माण झाला. साखर झोपेत असलेल्या नागरिकांच्या घरात काही तासांमध्ये पाणी घुसले, कुणाचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तर कुणाची जनावरे वाहून गेली. 

स्थानिक महसूल प्रशासन व पोलिसांच्या मदतीने तातडीने बाधित कुटुंब, लहान चिमुकले आणि जेष्ठ नागरिकांना जागृत करत सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठा अनर्थ टळला. शेकडो नागरिकांना प्रशासनाने सार्वजनिक रुग्णालय व शाळेमध्ये हलवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. पण हा तलाव फुटल्यानंतर वेळीच नागरिकांनी सावधगिरी बाळगल्याने व प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या वसमत पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही होऊन आमची घरे व कुटुंब कधी संरक्षित होणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT