बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूर, पिकांचं प्रचंड नुकसान! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूर, पिकांचं प्रचंड नुकसान!

गेवराई राहेरी, तलवाडा रोहितळ, राजापुर येथील नदीला पुर आल्याने गावातील शाळेसह अनेक घरांमध्ये घुसले पाणी !

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात काल रात्रीत 75.2 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

हे देखील पहा -

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तर नद्यांसह, ओढे, बंधारे ओव्हरफ्लो झाल्यानं पिकांमध्ये पाणीचं पाणी झालं आहे. उभी पिकं आडवी झाली असून गेवराई तालुक्यातील रोहितळ, राजापुर, राहेरी,तलवडा येथे नदीला पुर आल्यानं अनेक गावाचा संपर्क तुटला होता. तर रोहितळ गावांमध्ये सकल भागात पाणी शिरले आहे.

नदीकाठच्या काही घरांसहीत शाळा परिसरात देखील पाणी भरलंय. त्याचबरोबर बीड, वडवणी, माजलगाव, परळी, केज, धारूर यासह सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT