बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूर, पिकांचं प्रचंड नुकसान! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूर, पिकांचं प्रचंड नुकसान!

गेवराई राहेरी, तलवाडा रोहितळ, राजापुर येथील नदीला पुर आल्याने गावातील शाळेसह अनेक घरांमध्ये घुसले पाणी !

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात काल रात्रीत 75.2 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

हे देखील पहा -

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तर नद्यांसह, ओढे, बंधारे ओव्हरफ्लो झाल्यानं पिकांमध्ये पाणीचं पाणी झालं आहे. उभी पिकं आडवी झाली असून गेवराई तालुक्यातील रोहितळ, राजापुर, राहेरी,तलवडा येथे नदीला पुर आल्यानं अनेक गावाचा संपर्क तुटला होता. तर रोहितळ गावांमध्ये सकल भागात पाणी शिरले आहे.

नदीकाठच्या काही घरांसहीत शाळा परिसरात देखील पाणी भरलंय. त्याचबरोबर बीड, वडवणी, माजलगाव, परळी, केज, धारूर यासह सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता येण्यास उशिर का? कितीने वाढणार पगार? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अजूनही व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीस

World Homeopathy Day 2026: होमिओपॅथीची औषधं घेताना कोणती काळजी घ्यावी? वाचा डॉक्टरांचा सल्ला

Monalisa : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा नवरा जेलमध्ये जाणार? पोलिसांत गुन्हा दाखल, अचानक नेमकं काय घडलं?

By-Election: बारामती पोटनिवडणुकीतील सस्पेन्स संपला; काँग्रेसच्या माघारीनंतर सुनेत्रा पवारांची आता अपक्षांशी लढत

SCROLL FOR NEXT