heat wave affects olive ridley turtle conservation project ratnagiri Saam Digital
महाराष्ट्र

Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

turtle conservation project ratnagiri: उष्णतेमुळे अंडी खराब झाल्यानं पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे कासवप्रेमींत चिंता वाढली

अमोल कलये

रत्नागिरी जिल्ह्यात कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी तापमान वाढीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. गेल्या काही वर्षांत अंडी संवर्धनाचा कार्यक्रम वनविभाग व स्थानिक कासवमित्रांच्या सहकार्याने यशस्वीपणे सुरू आहे. (Maharashtra News)

यंदा या अंडी संवर्धनाला तीव्र उन्हाळ्याचा फटका बसला असून वाढत्या उष्णतेमुळे अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे अंडी खराब झाल्यानं पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचं दिसून आलं आहे.

रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच किनाऱ्यांवर २३ हजार २७ अंडी आढळून आली होती. त्यातून १० हजार ७९६ पिल्लेच बाहेर पडली आहेत. यातील अनेक अंडी वाढलेल्या उष्णतेमुळे खराब झाली असल्याचं दिसून आलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT