heat wave affects olive ridley turtle conservation project ratnagiri Saam Digital
महाराष्ट्र

Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

turtle conservation project ratnagiri: उष्णतेमुळे अंडी खराब झाल्यानं पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे कासवप्रेमींत चिंता वाढली

अमोल कलये

रत्नागिरी जिल्ह्यात कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी तापमान वाढीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. गेल्या काही वर्षांत अंडी संवर्धनाचा कार्यक्रम वनविभाग व स्थानिक कासवमित्रांच्या सहकार्याने यशस्वीपणे सुरू आहे. (Maharashtra News)

यंदा या अंडी संवर्धनाला तीव्र उन्हाळ्याचा फटका बसला असून वाढत्या उष्णतेमुळे अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे अंडी खराब झाल्यानं पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचं दिसून आलं आहे.

रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच किनाऱ्यांवर २३ हजार २७ अंडी आढळून आली होती. त्यातून १० हजार ७९६ पिल्लेच बाहेर पडली आहेत. यातील अनेक अंडी वाढलेल्या उष्णतेमुळे खराब झाली असल्याचं दिसून आलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीपात्रात पुन्हा मळी मिश्रित पाणी सोडण्याचा प्रकार समोर

Narali Bhat Recipe: या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा झटपट टेस्टी नारळी भात रेसिपी

Akola : अकोला पोलिसात खळबळ; कारवाई टाळण्यासाठी मागितली खंडणी, पोलिसांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Pune Crime : कॅफेमधील 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

SCROLL FOR NEXT