Gopichand Padalkar, Ajit Pawar, Vita, Sangli saam tv
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : बारामती तालुक्यातील 44 गावं पाण्यापासून वंचित का आहेत ? पडळकरांचा पवारांना सवाल

विटा येथे माध्यमांशी गाेपीचंद पडळकर यांनी संवाद साधला.

विजय पाटील

Gopichand Padalkar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष नसून एक टोळी आहे आणि तो आज ना उद्या संपेल अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. दरम्यान पडळकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर देखील आपल्या मतदारसंघातील प्रश्न साेडवा अशी टिप्पणी केली आहे. विटा (सांगली) येथे माध्यमांशी पडळकरांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एनसीपीचा आणि नेत्यांचा समाचार घेतला. (Maharashtra News)

गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत केवळ स्थापनेपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि तो आजपर्यंत बदलला गेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा देखील नाही. हा पक्ष फुटणार नाही कारण तो आज ना उद्या संपणार आहे अशा शब्दात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर (NCP) निशाणा साधला.

पडळकर यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले अजित पवार सांगतात आपण लाखाच्या मताने बारामती मधून निवडून येतो. जर तुम्ही लाखांच्या मताने निवडून येत असाल तर बारामती तालुक्यातील 44 गाव हे पाण्यापासून वंचित का आहेत ? असा सवाल पडळकरांनी केला आहे.

दुष्काळ सुरू झाला की महाराष्ट्रातून (maharashtra) या गावांची पाण्याची टँकर देण्याची पहिली मागणी असते याचा आधी विचार अजित पवारांनी केला पाहिजे. महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे त्यांनी बघावं असा टोलाही आमदार पडळकर यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT