Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: ८८६ गावांत पाणीटंचाईची झळ; पाण्यासाठी कोसभर पायपीट

८८६ गावांत पाणीटंचाईची झळ; पाण्यासाठी कोसभर पायपीट

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात ८८६ गावांत पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. यामुळे पाण्यासाठी (Gondia) प्रत्येकाची धावपळ हेात आहे. पाणी पुरवाठा विभागाचा अजब कारभारामुळे मृग नक्षत्र अर्धा लोटला तरी पाणीटंचाईची (Water Crisis) कामे झालीच नसल्‍याचे चित्र जिल्‍ह्यात आहे. (Latest Marathi News)

तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातही पाण्याची टंचाई भासत आहे. हजारो तलाव असणाऱ्या जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाई जाणवते. सद्यस्थितीत टँकरची गरज नसली तरी ग्रामीण भागातील नागरीकांना घोटभर पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असून जिल्ह्यातील 886 गावांत पाणीटंचाईची झळ निर्माण झाली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील अजून कामे नाही

जिल्हा परीषदेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईच्या उपाययोजना केल्या. मात्र पाणी टंचाईची कामे प्रत्यक्षात सुरू न झाल्यामुळे नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य धोरणामुळे चौथा टप्पा लागला असला तरी अद्यापही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाईची कामे सुरू झालेली नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT