रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जिंदाल कंपनीमधून वायू गळती झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकारने पालकांमध्ये भीती वाढली.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील जिंदाल कंपनीतील वायू गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. या शाळेतील 35 ते 40 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जयगडच्या जिंदाल कंपनीजवळील माध्यमिक शाळेच्या ५३ विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास झाला. कंपनीतील टाक्यांचं काम सुरु असताना गॅस लिकेज झाला आहे. आतापर्यंत 34 विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद म्हणाले,'रत्नागिरीत वायुगळतीमुळे त्रास झालेल्या मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. सर्व मुलं या ठिकाणी सुखरूप आहेत. ज्या विद्यार्थ्यांना श्वसनाला त्रास होतोय. त्यांच्यावर आमचं विशेष नजर आहे. बालरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्व मुलांवरती उपचार सुरू आहेत. 53 मुलांना वायुगळतीचा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.