MSEDCL News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: सणासुदीच्या काळात वीज खंडित; शिवसैनिकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव

सणासुदीच्या काळात वीज खंडित; शिवसैनिकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव

भूषण अहिरे

धुळे : सणासुदीच्या काळामध्ये शहरात वीज वितरण विभागाच्या (MSEDCL) मार्फत थकीत वीज बिल धारकांचे वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात रीक्षामधून अनाउन्समेंट केली जात आहे. सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांना विज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट करण्याचा धाक दाखवून वेठीस धरल्यावरून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. (Live Marathi News)

वीज वितरण विभागातर्फे सक्तीची वसुली करू नये तसेच शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव रोखण्यात यावा. या संदर्भात देखील (Shiv Sena) शिवसेनेच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सूचित करण्यात आले आहे. सक्तीची (Dhule News) वसुली त्याचबरोबर विजेचा सुरू असलेला लपंडाव थांबवला नाही. तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी

थकित बील असलेल्‍या ग्राहकांचे वीज कनेक्शन कट केले जाईल, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. या विरोधामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव घातला. सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांना विज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट करण्याचा धाक दाखवून वेठीस धरल्यावरून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT