धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आलीय. लोहारा तालुक्यातील जेवळी येथे स्वस्त धान्य दुकानातून आणलेल्या तांदळात चक्क दातांचा कवळी सापडल्याचा खळबळजनक दावा करण्यात येतोय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रेशनच्या धान्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेवळी येथील भागाबाई बाबुराव बिराजदार या महिलेने शुक्रवारी 'गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार' या संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य आणले होते. सायंकाळच्या वेळी त्यांच्या सुनेने भात शिजवण्यासाठी पिशवीतील तांदूळ निवडीसाठी चाळणीत घेतले. त्यावेळी तांदळात चक्क 6 ते 7 दातांची कवळी आढळली. हे पाहताच बिराजदार कुटुंबाला मोठा धक्का बसला. तांदळात सापडलेले हे दात काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आहेत. प्राथमिकदृष्ट्या हे दात मानवी आहेत की प्राण्याचे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु अन्न शिजवण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.