गेल्या अनेक दिवसांपासून बीडचे राजकारण तापले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेवर अनेक आरोप होत आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. याचसोबत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात होती. दरम्यान, अनेक नेत्यांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली आहे. नुकतेच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनीही धनंजय मुंडेची बाजू घेतली आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत, असं सांगितलं आहे.
भगवाड गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंची बाजू घेतली आहे.'भगवानगड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे'. असं त्यांनी म्हटलं आहे. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने सांप्रदायाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मिडियाने दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे... पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही. त्यांनी किती सोसावं? असंही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.