सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड कनेक्शन समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं.. मंत्रिपद जाऊन तब्बल 5 महिने उलटून गेले तरी मुंडेंनी आपला सातपुडा हा सरकारी बंगला मात्र सोडलेला नाही, त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळांना मात्र अजूनही बंगल्यासाठी वेटिंगवरच राहावं लागतंय...
खरंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 15 दिवसात शासकीय बंगला सोडणं नियमाने बंधनकारक असते.. मात्र बंगल्याचा ताबा न सोडल्यानं धनंजय मुंडेंना सार्वजनिक बांधकाम विभागाने 42 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.... मात्र हा दंड माफ केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं .दमानियांनी मुंडेंना घेरलंय...
आपल्याच सहकाऱ्यानं बंगला खाली न केल्यानं भुजबळ थेट बोलू शकत नसले तरी सातपुड्यात राहायला जाण्याची त्यांची इच्छा काही लपून राहिलेली नाही.
दुसरीकडे मुंडेंनी मात्र बंगला न सोडण्यामागे आपल्या तब्बेतीचं कारण पुढं केलंय... खरंतर राज्यात तब्बल 42 मंत्र्यांचं भलं मोठं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं... मात्र मंत्रिमंडळातील काही मोठे मंत्री आपला कारभार 2 शासकीय बंगल्यातून चालवत असल्याने तब्बल 16 मंत्र्यांना बंगल्याऐवजी अपार्टमेंटमधील फ्लॅटवरच समाधान मानावं लागतंय... त्यामुळे मुंडे शासकीय बंगला खाली कधी करणार आणि फ्लॅटमधील मंत्र्यांना शासकीय बंगले कधी मिळणार? हे पाहणं औत्स्युकाचं असेल..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.