Maharashtra Shakti Cyclone Saam Tv
महाराष्ट्र

Shakti Cyclone Update : महाराष्ट्रावर 'शक्ती'चं संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणाला धोका, मराठवाड्यातही धो धो, वाचा IMD चा इशारा

Maharashtra Shakti Cyclone News : अरबी समुद्रात तीव्र झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व वादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचं आगमन.

  • मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टी जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.

  • शासनाकडून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा आदेश जारी.

  • सरकारकडून आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस धोक्याचे ठरू शकतात. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार आहे. या हंगामातील हे पहिलं चक्रीवादळ असून ते काल तीव्र झालं आहे. मात्र आज ते अधिक तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या तीव्र शक्ती चक्रीवादळामुळे पुढील काही दिवसांत राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग, उंच लाटा यामुळे समुद्रातील परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली असून स्थलांतराच्या उपाययोजनांचीही तयारी केली आहे.

हवामान विभागाने चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिला असून, ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक असणार आहे.

चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने सरकारकडून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बोटींना बंदरातच थांबण्याचं सांगितलं असून जे समुद्रात आहेत त्यांना तात्काळ मागे परत येण्याचं सांगितलं आहे. तसंच किनारपट्टीवरील रहिवाशांना सावधानेचा इशारा दिला आहे. भरतीमुळे पाणी साचू शकतं, अशात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान खात्याने किनारपट्टीच्या भागांव्यतिरिक्त, महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तर कोकणात सखल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पूरस्थितीमुळे जनजीवन विस्तळीत होण्याची शक्यता पाहता राज्य सरकारने जिल्हा प्रशासनांना संभाव्य आपत्कालीन स्थितीत तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic : मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

Maharashtra Live News Update : खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास ठेकेदार अन् संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसुली

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्माचे कर्णधारपद काढलं, गिलकडे नवी जबाबदारी, ऑस्ट्रोलिया दौऱ्यात भारतीय संघात मोठे बदल

Anarsa Recipe: दिवाळीनिमित्त घरच्याघरी बनवा तांदळाच्या पिठाचे खुसखुशीत अनारसे

Hair Care: टक्कल पडण्याच्या भीतीने रात्रीची झोप उडालीये? मग हा १ घरगुती उपाय कराच

SCROLL FOR NEXT