yashomati thakur narendra modi 
महाराष्ट्र

'दाढीवाला बाबा काही पण करीत असताे, त्यावर विश्वास ठेवू नका'

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अरुण जोशी

अमरावती : केंद्र सरकारने मागे घेतलेले काळे कायदे हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. मोदी सरकारच्या पीछेहाटीची ही सुरुवात आहे. केंद्र सरकारने केवळ घोषणा करून चालणार नाही तर सभागृहात हे काळे कायदे मागे घेतल्याचे जाहीर करायला हवे अशी भावना काॅंग्रेसच्या नेत्या अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदा मागे Farm Laws To Be Repeal घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देशभरातून विराेधी तसेच समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या शेतकरी न घाबरता संघर्ष करीत राहिला. हिटलरशाही, माेदीशाहीला आज शेतक-यांनी हरविले. हे तीन कायदे रद्द झाले हे आज तरी आपल्याला दिसून येत आहे.

वास्तविक हाेणे गरजेचे अन्यथा उत्तर प्रदेशची निवडणुक डाेळ्यासमाेर ठेऊन हे नुसतंच म्हटलं जाईल. कारण आपला दाढीवाला बाबा काही पण करीत असताे. यावर विश्वास न ठेवता संसदेत कायदा रद्द झाला पाहिजे. आगामी काळातील निवडणुकांत ते हरतच राहणार हे लक्षात घ्यावं. आज लाेकशाहीचा विजय झाल्याचे यशाेमती ठाकूर यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT