सातारा : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. मात्र, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील असलेले भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, राजकारणासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि नंतर जातीयवादी पक्ष म्हणतात. पण, आपण हा खोटारडेपणा ओळखला पाहिजे. काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असतं. त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करायला हवा. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला, गडकिल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथे जिथे पाऊल खुणा आहेत, त्यांना जितकं महत्त्व दिले तेवढे काँग्रेसच्या राजवटीत कधीही झालेले नाही, हे आम्ही बघितलेले आहे.
आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो, माझे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होतं. पण, कधीही काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला जेवढं लोकांपर्यंत आणायला हवं होतं, तेवढं आणलेलं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.