Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde | बंडखोरी का केली ? CM एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, 'वीर सावरकरांच्या विरोधात...'

वीर सावरकरांच्या विरोधात बोचरी टीका करण्याऱ्यांविरोधात आम्ही भूमिका घेऊ शकत नव्हतो. दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या विरोधात आम्ही भूमिका घेऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही ही भूमिका घेतली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीवर दिले.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

सिल्लोड : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार त्यांनी झाल्यावर बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. 'बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला जवळ केले गेले. वीर सावरकरांच्या विरोधात बोचरी टीका करण्याऱ्यांविरोधात आम्ही भूमिका घेऊ शकत नव्हतो. दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या विरोधात आम्ही भूमिका घेऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही ही भूमिका घेतली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीवर दिले. मुख्यमंत्री हे सिल्लोड दौऱ्यावर असून ते एका कार्यक्रमात बोलत होते. (Eknath Shinde News In Marathi )

आज, रविवारी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'महाविकास आघाडी होण्याआधी राज्यात भाजपसोबत सरकार होणार होते, पण काहींची वक्तव्य बाहेर आली, 'आम्हाला अनेक मार्ग आहेत'. मी स्वत: साक्षीदार आहे. अडीच वर्षाचा विषय असेल तरीही चर्चा करून मार्ग काढू, असे म्हणालो होतो. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणेच सरकार स्थापन झाले'.

'मी भाजपच्या नेत्यांना अडीच वर्षाच्या सरकारबाबत विचारले. त्यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्या जागा कमी येऊनही त्यांना मुख्यमंत्रिपद भाजपने दिले. भाजपने नितीश कुमार यांना शब्द दिला होता, तर महाराष्ट्रात दिला नसता का ? शिवसेनेला शब्द दिला असता तर कशाला फिरवला असता ?, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अर्जुन खोतकरांवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'ईडीमुळे दबावासाठी अर्जुन खोतकर आले अशी चर्चा झाली. मी रामदास कदम यांच्यासमोर त्यांना विचारले. ईडीचा धाक असेल, तर येऊ नका, मी खोतकरांना सांगितले होते. मात्र, खोतकर यांनी ९७ च्या वेळीच ही सुप्त ईच्छा होती हे सांगितले'. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. 'योगेश कदम यांची ताकद वाढता कामा नये यासाठी खच्चीकरण केले गेले. रामदास कदम यांच्याशी तुमचं पटत नसेल, पण त्या आमदार योगेश कदमने तुमचे काय केले होते ?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT