CM Shinde: कापूस, सोयाबीन आणि कांद्याने आम्हाला रडवलं; लोकसभेत मोठा फटका बसला: मुख्यमंत्री
Chief Minister Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

CM Shinde: कापूस, सोयाबीन आणि कांद्याने आम्हाला रडवलं; लोकसभेत मोठा फटका बसला: मुख्यमंत्री

Bharat Jadhav

गणेश कावडे, साम प्रतिनिधी

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक भागात कांद्याने रडवले. ⁠तर, सोयाबीन आणि कापसाने आम्हाला त्रास दिला. त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय. ते केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत बोलत होते. शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी सह्याद्री बंगल्यावर बैठक होत आहे.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी पराभवांचं कारण सांगितलं. राज्यामध्ये सत्तेत असताना सुद्धा महायुतीला लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश मिळवता आले नाहीये. निवडणुकीत कोणत्या कारणांमुळे जागा कमी झाल्या याचं विचारमंथन महायुतीतील पक्ष करत आहेत. कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला याची माहिती मतदारसंघानिहाय घेतली जात आहे.

महायुतीला लोकसभेत संविधान बदलाच्या मुद्द्यासह कापूस, सोयाबीन आणि कांद्यांचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. आज सह्याद्री बंगल्यावर झालेल्या शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक झाली. त्यात खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनी त्याची कबुली दिली. सोयाबीन आणि कापसा करता साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली पण आंचार संहितेत अडकली. दरम्यान ⁠सोयाबीन, कापूस आणि कांद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे काही ठोस निर्णय घेणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT