CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

Bharat Jadhav

'आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पाडणारे लोक नाही, आम्ही जे जे बोललं, ते ते केलं. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी नेहमीप्रमाणे दांडी मारली. त्यावेळी माध्यमांशी बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यांनी महायुती सरकारसह केंद्रातील मोदी सरकरावरही टीका केली.

हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. मोदी सरकारने उत्पादन शुल्काच्या दीडपट हमीभाव देणार असल्याचं सांगितलं. परंतु तसे झाले नाही. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी सरकारने केलं. सरकारला दीडपट हमीभाव देता येत नाहीये. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. हे सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत. बि- बियाणांचा काळाबाजार सुरू आहेत, अशी टीका विजय वडेवट्टीवार यांनी केली होती.

विरोधी पक्षनेत्याच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पाडणारे लोक नाहीत, आम्ही जे जे बोललं तेते केलं, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला. आम्ही जे बोललं आहे ते ते आम्ही दिलं आहे, विरोधकांनी तपासून पाहावं, उद्या जे काही अर्थसंकल्पात सगळ्यांच्या हिताच्यां गोष्टी निघतील, शेतकरी जनता , माता-भगिनींच्या हितांच्या गोष्टी अर्थसंकल्पात मांडल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

हे सरकार काम करणारं सरकार असल्याचं सांगताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. खरिपाच्या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांच्या निर्णय घेतलेत. आम्ही एनडीआरएफचे निकष आम्ही बदललेत. १५ हजार कोटी रुपयांची नुसती नुकसान भरपाई दिलीय. एक रुपयांत पीक विमा देणार आपलं पहिलं राज्य आहे. विरोधकांच्या उद्योग पळवण्याच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, हे सर्व समावेशक सरकार आहे. या महाराष्ट्रात १ लाख ३७ कोटींची गुंतवणूक झाली. त्यानंतर पाच लाख कोटी रुपयांची गुंतवूणक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

Drone Terror : मराठवाड्यात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचं गुढ उलगडलं; पोलिसांचा खळबळजनक खुलासा

Gujrat Road Accident: मोठी दुर्घटना! डिवायडर तोडून भरधाव बसची वाहनांना धडक; चार चिमुकल्यांसह ७ जण ठार

PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT