Satara Police, Local Crime Branch Saam Tv
महाराष्ट्र

Underage Pregnancy In Chhatrapati Sambhajinagar : चिंताजनक! अल्पवयात गर्भधारणा; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Crime News : अल्पवयात आई व गर्भवती होण्याचे प्रमाणही सरासरी 13 टक्क्यांवर आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar : बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 नुसार विवाहासाठी मुलाचे वय 21, तर मुलीचे वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे. या वयाखालील विवाह बेकायदा ठरतात. मात्र, मराठवाड्यात परिस्थिती वेगळी आहे. पाचव्या राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणानुसार मराठवाडा हा बालविवाहांची राजधानी ठरत आहे. विभागात बालविवाहांचे प्रमाण सरासरी 37 टक्के आहे. अल्पवयात आई व गर्भवती होण्याचे प्रमाणही सरासरी 13 टक्क्यांवर आहे. (Crime News)

राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार मराठवाड्यातील सर्वाधिक बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती आली आहे आणि यामुळेच कमी वयात गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढल्याचं वास्तव समोर आला आहे यामध्ये सर्वाधिक संख्या बीड परभणी या भागात दिसून आली आहे. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती टक्के बालविवाह झाले आहेत याची जिल्हा निहाय माहिती जाणुन घेऊ.

छत्रपती संभाजीनगर 35.8, जालना 35, हिंगोली 37, परभणी 48, बीड 44, लातूर 31, धाराशिव 36 टक्के तर नांदेड 32 टक्के इतके बालविवाह सरासरी वर्षात होत असल्याचं अहवालातून समोर आलंय. तर कमी वयात गर्भवती होण्याच्या प्रमाणामध्ये देखील मोठी वाढ झाली असून यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12.4 टक्के, जालना 10, हिंगोली 14, परभणी 13, बीड 15, लातूर 14, धाराशिव 16 तर नांदेड 8 टक्के अशी ही टक्केवारी नुकतीच समोर आली आहे.

बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असली तरी त्याची अनेक कारणे देखील समोर आली आहेत. यामध्ये गरिबी हा सर्वात मोठा मुद्दा मानला जातो. कुटुंबात आर्थिक उत्पन्न कमी आणि त्यात खाणारी तोंड जास्त, शिक्षण देणं शक्य होतं नसल्यामुळे कमी वयात मुलीला सासरी पाठवून तिला सुरक्षित करण्याचा मानस आई-वडिलांचा असतो. तर आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया मोबाईल याचा वाढता प्रभाव यामुळे मुलींमध्ये दिसणारे बदल पालकांना चिंतेत टाकतात आणि त्या अनुषंगाने त्यांचा विवाह करून देण्याचा घाट घातला जातो, असं बालकल्याण समिती अध्यक्ष आशा शेरखाने-कटके यांनी म्हटलं आहे.

बालविवाह रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. बालकल्याण समितीकडे आतापर्यंत आलेल्या प्रकरणात तीन महिन्यात नऊ बालविवाह रोखण्यात यश प्राप्त झाले आहे. मात्र हे पुरेसे आहे कारण तक्रारी न येणाऱ्या विवाहांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच गावातील प्रत्येक नागरिकाने ही आपली जबाबदारी समजून बालविवाह रोखण्यास मदत करायला हवी असे आवाहन बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT