बुलढाणा : नागपूर- मुंबई असा ७०१ किलोमीटरचा जागतिक दर्जाचा दृतगती असलेला समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार झाला आहे. या मार्गाने आता नागपूर ते मुंबई आठ तासात गाठता येत आहे. मात्र समृद्धी महामार्गावर वेगाच्या नियमांचे उल्लंघन अनेक वाहने करताना आढळून येतात. आता मात्र वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहन धारकास दंड ठोठावण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वाहनाच्या वेगावर सीसीटीव्हीद्वारे नजर राहणार आहे.
राज्यात साकारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गामुळेमुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास फक्त ८ तासांमध्ये गाठता येणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. आता समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे. त्यानुसार प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा देखील आता पुरविल्या जाणार आहेत.
१ किमी अंतरावर बसणार स्पीड सेंसर गन
या संपूर्ण सातशे एक किलोमीटरच्या महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर एक सीसीटीव्ही कॅमेरा व स्पीड सेंसर गन लावण्यात येणार आहे. त्यामुळे वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांना तात्काळ दंडाची पावती मोबाईलवर मिळणार आहे. आता समृद्धी महामार्गावर जवळपास एक हजार कॅमेरे बसविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपन्यांसोबत करार केल्याची ही माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अशी राहणार वेग मर्यादा
दरम्यान समृद्धी महामार्गावरून जाताना वाहने सुसाट वेगाने धावत असतात. परंतु आता यामुळे समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा घालून देण्यात येणार आहे. त्यानुसार हलक्या वाहनांसाठी वेग मर्यादा १२० किलोमीटर प्रति तास तर ट्रक आणि अवजड वाहनांसाठी ८० किलोमीटर प्रतितास अशी वेग मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र अनेक वाहने वेग मर्यादेसह लेन कटिंगचे उल्लंघन करताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.