Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: २५ दिवसांपासून नळाला पाणी नाही; संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा

२५ दिवसांपासून नळाला पाणी नाही; संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरपांग्रा गावात पाणी प्रश्न पेटला आहे. तब्बल २५ दिवस गावात नळाला पाणी येत नसल्याने महिलांची (Buldhana) पाण्यासाठी मोठी कुचंबणा होत आहे. सातत्याने ग्रामपंचायतकडे (GramPanchayat) पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा करून देखील ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव गावातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शेकडोच्या संख्येत ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला आहे. (Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरपांग्रा गावात पाणी प्रश्‍न भेडसावत आहे. महिलांसोबत ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झाले. त्यामुळे मलकापूर पांगरा गावात पाणी प्रश्न (Water Crisis) पेटला आहे. मलकापूर ग्रामपंचायताकडे चार विहिरी असून पाण्याची टाकी सुद्धा आहे. विहिरींना मुबलक पाणी आहे. गावात नळयोजना सुद्धा आहे. मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना पणी मिळत नाही. परिणामी महिलांना गावाबाहेरील विहिरीवरून पाणी आणावे लागते. तर चारशे ते पाचशे रुपये देऊन टँकर विकत घ्यावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन ही याकडे दुर्लक्ष होत आहे.

आक्रमक आंदोलनाचा इशारा

ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ गावाला पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा पुन्हा आक्रमक आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. जोपर्यंत गावात नियमित पाणीपुरवठा होणार नाही; तोपर्यंत मोर्चा मागे घेणार नाही, असा पवित्रा संतप्त महिलांकडून घेतल्याचे पाहायला मिळाले. तर पाणी द्या पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली कारा, या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT