Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime : बनावट शेतकरी दाखवून कोट्यवधींचा निधी लाटला; दोन तलाठ्यांसह एकजण ताब्यात

Buldhana News : मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात अनेकांच्यात शेतातील पिके वाहून गेली तर काहीच्या शेती खरडून गेल्या होत्या.

संजय जाधव

बुलढाणा : अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील नुकसानीची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या खात्यावर हा मदत निधी टाकण्यात येत होता. असे असताना देखील बनावट शेतकरी दाखवून शासनाकडून येणारा कोट्यवधींचा निधी तलाठ्यांनी मिळून लाटण्यात आल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे. 

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असते. त्यानुसार अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई देण्यात येत असते. अर्थात प्रशासनाकडून पंचनामे करून त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असते. तर मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात अनेकांच्यात शेतातील पिके वाहून गेली तर काहीच्या शेती खरडून गेल्या होत्या.

तलाठ्यांच्या कारनामा 

संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देण्यात येणार होती. यासाठी तलाठ्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. मात्र तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे यांनी नुकसानग्रस्त बनावट शेतकरी उभे करून त्यांची नवे शासनाकडे पाठविण्याचा कारनामा केला होता. यात कोट्यवधीची अतिवृष्टीची मदत लाटल्याचे उघड झाले होते. 

एका ठिकाणी बसून नुकसानीचा सर्व्हे 

तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे व संगणक चालक महादेव पाटील या तीन महाठगानी एका ठिकाणी बसून नुकसानीचे सर्वे करीत जे शेतकरी नाहीत; त्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये शासनाकडून वसुल केले होते. दरम्यान तत्काळीन तहसीलदार शीतल सोलट यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. बुलढाणा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पाच महिन्यांपासून होते फरार 
दरम्यान तिन्ही आरोपी ऑगस्ट महिन्यापासून फरार होते. मात्र चिखली तालुक्यातील रानंत्री येथून आरोपी तलाठी अनंता माठे याला ताब्यात घेतले. तर खामगाव मधून तलाठी आरोपी उमेश बिल्लेवार तर जळगाव जामोद मधून कॉम्प्युटर ऑपरेटर महादेव पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. आता या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर पुढील चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

SCROLL FOR NEXT