Bombay High Court saam tv
महाराष्ट्र

Bombay High Court: मोठी बातमी! राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग टेस्ट पुन्हा होणार

मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदासाठी घेण्यात आलेली टायपिंग स्किल टेस्ट रद्द केली आहे. महाराष्ट्रातील अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणींच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता नव्याने अधिसूचना जारी होणार असून परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आलीये. मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदासाठी घेण्यात आलेली टायपिंग स्किल टेस्ट रद्द करण्याचे आदेश दिलेत. आता या परीक्षेसाठी नव्याने अधिसूचना जारी करण्यात येणार असून त्यानंतर परीक्षेच्या नवीन तारखाही जाहीर केल्या जातील. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी टायपिंग स्किल टेस्ट घेण्यात आली होती. मात्र, राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली. कल्याण, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाशिम, भंडारा आणि राज्यातील इतर भागांतील परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला.

काही ठिकाणी सर्व्हर बंद पडल्याच्या तक्रारी होत्या तर काही उमेदवारांनी की-बोर्ड व्यवस्थित काम करत नसल्याचं सांगितलं. परीक्षा सुरू असताना काही उमेदवारांचे कॉम्प्युटर अचानक लॉग आऊट झाल्याच्याही घटना घडल्या. या सर्व तांत्रिक अडचणींमुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देताना मोठा त्रास झाला.

कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरमधील काही परीक्षा केंद्रांवर परिस्थिती बिघडल्यानंतर उमेदवारांनी आंदोलन केलं. परीक्षा व्यवस्थित घेण्यात आली नाही आणि अनेकांना परीक्षा देता आली नाही, असा त्यांचा आरोप होता.

परीक्षा घेण्यासाठी बाहेरील एजन्सीची मदत

मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी घेण्यात येणारी टायपिंग परीक्षा उच्च न्यायालयाकडून आयोजित केली जाते. मात्र, परीक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालय बाहेरील विक्रेते किंवा तृतीय पक्ष परीक्षा एजन्सीची मदत घेते. परीक्षेदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींची चौकशी करण्यात येत आहे.

सुमारे 11 हजार उमेदवारांची होती परीक्षा

महाराष्ट्रातील 19 परीक्षा केंद्रांवर जवळपास 11 हजार उमेदवारांनी ही टायपिंग टेस्ट द्यायची होती. कल्याणमधील एपीएमसी मार्केट येथील परीक्षा केंद्रावर 400 हून अधिक उमेदवारांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं.

स्थानिक प्रशासनाने लेखी स्वरूपात काही उमेदवार परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचूनही तांत्रिक समस्यांमुळे त्यांना परीक्षा देता आली नाही, हे मान्य केलं. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा व्यवस्थित होऊ शकली नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर उशिरा रात्री उमेदवारांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं.

मात्र, परीक्षा पुन्हा नेमकी कधी घेतली जाणार, याबाबत त्यावेळी कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नव्हती. आता परीक्षा रद्द करण्यात आल्याने उमेदवारांना नव्या अधिसूचनेची आणि नवीन परीक्षेच्या तारखांची प्रतीक्षा आहे.

उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने दिले होतं स्पष्टीकरण

रविवारी सायंकाळी उशिरा मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. या निवेदनात महाराष्ट्रातील परीक्षा एकूणच सुरळीत पार पडल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरसह काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी झाल्याच्या तक्रारी मिळाल्याचेही रजिस्ट्रार यांनी मान्य केलं होतं. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या प्रक्रियेशी संबंधित तांत्रिक अडचणींची चौकशी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

या प्रकरणात पुढे काय निर्णय घेतला जाणार, याची माहिती उमेदवारांना अधिकृत सूचनेद्वारे दिली जाईल, असंही रजिस्ट्रार यांनी स्पष्ट केलं होतं. आता टायपिंग परीक्षा रद्द झाल्याने नवीन अधिसूचना आणि परीक्षेच्या नव्या तारखांकडे सर्व उमेदवारांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीच्या कुपवाड शहरासह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसाची दमदार हजेरी

Mumbai Crime: दारू पार्टीत चेष्टा केल्याचा राग डोक्यात गेला, झोपलेल्या मित्राला जागीच संपवलं

शिंदेंनी डाव टाकला; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने असंख्य कार्यकर्त्यांसह हाती घेतलं धनुष्यबाण

Vastu Shastra: दुसऱ्यांचे कपडे आणि चप्पल घातल्याने काय होते?

सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

SCROLL FOR NEXT