Priya More
आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांचे कपडे आणि चप्पल घालतो ही एक सामन्य गोष्ट आहे. अनेकदा गरज म्हणून आपण या गोष्टी करतो.
वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांचे कपडे आणि चप्पला घालणं हे चांगले मानले जात नाही. त्यामुळे अनेक गंभीर परिणाम होतात.
वास्तुशास्त्रानुसार व्यक्ती दररोज वापरत असलेल्या वस्तूंचा त्याच्या जीवनावर आणि वागणुकीवर परिणाम होतो. कपडे शरीराच्या थेट संपर्कात येतात तर बूट बराच काळ पायात राहतात. याच कारणामुळे, त्यांना वैयक्तिक वस्तू मानले जाते.
दीर्घकाळ वापरलेल्या वस्तूंमध्ये एखाद्या व्यक्तीच्या ऊर्जेचा प्रभाव टिकून राहू शकतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तींचे जुने कपडे आणि बूट घालणे टाळावे असा सल्ला दिला जातो.
प्रत्येक वेळी दुसऱ्याचे कपडे घालणे चांगले नसते. लहान भावंडे अनेकदा मोठ्या भावाचे किंवा बहिणीचे कपडे घालतात आणि हे सामान्य मानले जाते. अनेक कुटुंबांमध्ये जुने कपडे जपून ठेवण्याची आणि ते कुटुंबातील इतर सदस्यांना देण्याची परंपरा असते.
वास्तूशास्त्र अनोळखी व्यक्तींनी वापरलेल्या वस्तूंबाबत विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कुटुंबात कपडे वाटून घेणे हे बाहेरच्या व्यक्तीचे जुने कपडे घालण्यासारखे मानले जात नाही.
दुसऱ्यांच्या चप्पल वापरू नका कारण चप्पल जमिनीच्या आणि अनेक बाह्य जागांच्या थेट संपर्कात येतात. त्यामुळे त्यांचा संबंध पृथ्वी तत्त्व आणि बाह्य पर्यावरणाशी जोडला जातो.
चप्पल धूळ आणि घाणीसोबतच नकारात्मक प्रभावही वाहून आणू शकतात. त्यामुळे दुसऱ्याच्या चप्पल थेट घालणे टाळवे. अनोळखी व्यक्तींच्या चप्पल घालताना सावधगिरी बाळगा.
आवडत्या व्यक्तीचे कपडे घालायचे असतील तर ते व्यवस्थित धुवा. कपडे धुणे हे शुद्धिकरणाचे प्रतीक मानले जाते. कपडे दान करताना ते घाणेरडे, फाटलेले आणि खराब तर नाहीत ना याची खात्री करा.