ravindra chavan  Saam tv
महाराष्ट्र

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

BJP at 47: रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या ४६ वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. तळागाळातील कार्यकर्ते आणि देशभरातील मजबूत विचारधारेच्या जोरावर पक्षाच्या वाढीवर भर दिल्याचं चव्हाण म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपची ६ एप्रिल १९८० रोजी स्थापना

भाजपच्या स्थापनेला ४६ वर्ष पूर्ण

भाजपच्या राजकीय इतिहासावर रविंद्र चव्हाण यांचं भाष्य

भाजपची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झालीये. याच भाजपने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केलंय. पक्षाच्या स्थापनानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर लेख लिहून आपले विचार मांडलेत. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी भाजपचा राजकीय इतिहासही सांगितला.

'विचारधारा आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला पक्ष विशाल वटवृक्ष आज ४७व्या वर्षात पदार्पण करतोय. ६ एप्रिल १९८० रोजी रोवलेले हे बीज आज सुमारे २५ कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने संपूर्ण देशभर विस्तारलंय, असेही चव्हाण यांनी सांगितले.

'भाजप कार्यकर्ता, भाजयुमोचा उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने जेव्हा मी पक्षाच्या इतिहासाकडे पाहतोय, त्यावेळी मला विचारधारेने एक एक कार्यकर्ते घडवले. तसेच असंख्य ध्येयवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या रक्ता-घामाने गुरुदक्षिणा म्हणून पक्षाला घडवलंय, असे चव्हाण यांनी सांगितले.

'देशात नेहरू-गांधींची अल्पसंख्याक-केंद्रित समाजवादी विचारसरणी आणि साम्यवादी चळवळींचा जागतिक प्रभाव होता. त्यावेळी जनसंघाच्या माध्यमातून बहुसंख्य आणि वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचे आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धैर्य डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी दाखवून दिलं. त्यांची दूरदृष्टी आमच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

'पक्षावर ‘शेटजी-भटजी’ची पार्टी म्हणून टीका व्हायची. त्याच भाजपने ४६ वर्षांत महाराष्ट्रात ११ बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष दिलेत. हे राज्यात जातीय राजकारण करणाऱ्यांना ठोस उत्तर आहे. एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सांभाळताना अभिमान वाटतोय. सामान्य कार्यकर्त्यापासून या पदापर्यंत पोहोचणे केवळ भाजपमध्येच शक्य आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

इराण-अमेरिका युद्ध निर्णायक वळणावर, 48 तासांत शांतता की महायुद्ध भडकणार?

SCROLL FOR NEXT