Beed News  Saam TV
महाराष्ट्र

Beed Unseasonal Rain News: बीडला अवकाळी-गारपिटीचा तडाखा, वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर शेतीचं मोठं नुकसान

Beed News : जिल्ह्यातील विविध भागात 12 ते 15 जनावरे दगावली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Beed News : बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट आणि विजेचा कडकडाट यामुळे शेतात होत्याचं नव्हतं झालं. नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर अन्य 2 शेतकरी जखमी झाले आहेत.

त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध भागात 12 ते 15 जनावरे दगावली आहेत. मोठमोठ्या गारांनी कांदा चाळीवर असलेल्या पत्र्याची चाळण झाली. अनेक ठिकाणी गारपीटीमुळे बर्फाची चादर बीड जिल्ह्यात पाहायला मिळाली. शेतातील गहू, ज्वारी, आंबा, मोसंबी, पपई, टरबूज, भाजीपाला यासह विविध पिकं भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

महादेव किसन गर्जे वय 60 राहणार सुर्डी असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेळ्या चरण्यासाठी गेले असता अचानक वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र याचवेळी झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच मुत्यू झाला. तर यावेळी त्यांच्या दोन शेळ्या देखील दगावल्या आहेत.

दुसरी घटना बीड तालुक्यातील तिप्पटवाडी येथे घडली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज पडून दोन बैल दगावले आहेत. यामुळे शेतकरी आनंता नामदेव शेडगे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तिसरी घटना केज तालुक्यातील देवगाव व मांगवडगाव येथे घडली. देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे यांचा बैल तर मांगवडगाव येथे वीज पडून दत्तू मुळूक यांची गाय दगावली आहे.  (Latest Marathi News)

चौथी घटना केज तालुक्यातील रामेश्वरवाडी शिवारात घडली. शेतामध्ये असलेले जयराम तुकाराम हंगे यांचा 1 बैल व 1 गाय तसेच शशिकांत संपतराव हंगे यांचा 1 बैल वीज पडून दगावले आहेत. यासह जिल्ह्यातील अनेक भागात अशा घटना घडल्या आहेत. (Beed News)

केज तालुक्यातील मांगवडगाव येथील सरु बाई गुणवंत गायकवाड आणि सुकुमार रामधन गायकवाड या एकाच घरातील शेतकऱ्यांचे, सोलारचे दोन सेट वादळी वाऱ्याने पूर्णपणे उखडून गेले आहेत. काही सोलार प्लेट्स या विहिरीमध्ये जाऊन पडल्या. शेतकरी गायकवाड कुटुंब त्या सोलारवर दहा एकर जमीन भिजवत होते. 2019 ला हे सोलार बसवलेले होते आणि तेव्हापासून त्यांचं शेतीचे उत्पन्न वाढलं होतं. मात्र एका दिवसामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि या शेतकरी कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे.

तर बीड तालुक्यातील पोखरी घाट येथे झालेल्या, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात गारपिटीने शेतकरी संदिपान अंबादास झांजुर्णे यांच्या शेतातील कांदा चाळीचे सिमेंट पत्र्यांची चाळण झाली आहे. यामुळे त्यांचे अंदाजे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. कांदा चाळीचे सिमेंट पत्रे हे गारांनी फाटले आहेत. तसेच प्लास्टिक पाण्याच्या टाक्या फुटल्या आहेत. तसेच आंब्याच्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले असून एकही कैरी झाडाला राहीली नाही, कैऱ्यांचा सडा पडला आहे.

दरम्यान अगोदरचं अतिवृष्टी अन अवकाळीच्या कहरातून शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतांना पुन्हा एकदा अवकाळी अन गारपिटीने हाहाकार केल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ आधार देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT