Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडच्या सहकार क्षेत्रात खळबळ; माजलगावच्या मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या आठ संचालकाचे सामूहिक राजीनामे

Beed News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या आहेत.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात पतसंस्था मल्टीस्टेट घोटाळ्याचे जणू काही लोणच पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा (Beed) बीडच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून माजलगाव येथील मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या ८ संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या आहेत. यात मागील महिन्यातच जिल्ह्यातील २० शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर आता माजलगावच्या मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासकाची नेमणूक 

मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या ८ संचालकांनी राजीनामे दिल्याने याठिकाणी सहाय्यक निंबधकांकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पतसंस्थेच्या ठेवीदारांची धाकधूक वाढली असून आपल्या ठेवी कशा मिळवाव्यात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : रोजा सोडला, चहा पिण्यासाठी निघाले पण वाटेतच काळाने घातला घाला, सोलापूरमध्ये २ मित्रांचा अपघाती मृत्यू

PM Ujjawala Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पदरी निराशाच! गॅस सब्सिडीसाठी ४५ दिवसांची अट, अन्नपूर्णा योजनेचा निर्णय फक्त कागदावरच

Morning Walk Benefits : सकाळी फक्त अर्धा तास चालण्याचे हे फायदे वाचाल, तर आजच जिमला जाणे सोडाल

Education Scam : शिक्षण विभागातील सर्वात मोठा घोटाळा, सरकारलाच १५० कोटींचा गंडा, अशी झाली पोलखोल

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT