Beed : बोहल्यावरून उतरताच नवरा-नवरीने घेतली कोरोना प्रतिबंधक लस! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : बोहल्यावरून उतरताच नवरा-नवरीने घेतली कोरोना प्रतिबंधक लस!

नव्या आयुष्याची सुरुवात करताना कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा दिला अनोखा संदेश!

विनोद जिरे

बीड : बोहल्यावरून उतरताच नवरदेव नवरीने लस घेत, नव्या आयुष्याची सुरुवात करताना कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा अनोखा संदेश दिला आहे. बीडच्या माजलगाव येथील फिरंगे व चाळक परिवारातील प्रसाद व पूजा यांच्या विवाह सोहळ्यात मोफत कोरोना लसीकरण कॅम्प घेत, सर्व वऱ्हाडी मंडळींचे लसीकरण करून घेतले. या लग्न सोहळ्यात जवळपास 60 लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतलाय. यामुळे लसीकरणाची जनजागृती व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत, फिरंगे आणि चाळक परिवाराने वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे लसीकरणात बीडचा कमी असलेले टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

हे देखील पहा :

बीडच्या माजलगाव जवळील एकदरा गावच्या चाळक कुटुंबातील पूजा चाळकचा, पुण्यातील वाघोली येथील प्रसाद फिरंगे याच्याशी विवाह संपन्न झाला. मोठ्या थाटात माजलगावमधील सौभाग्य लॉन्समध्ये हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी पूजा आणि प्रसाद यांनी लग्न लागल्यानंतर बोहल्यावरून उतरून थेट कोरोना प्रतिबंधक लस घेतली. तसेच लग्नासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळीला चौकशी करून लस घ्यायला लावले. आज या लग्नसोहळ्यात तब्बल 60 लोकांनी लस घेतलीय. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या कुटुंब परिवार व नातेवाईकांची काळजी घेण्यासाठी नवरदेव आणि नवरी यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या लसीकरण कॅम्पची चर्चा सर्वत्र होत आहे.

लसीकरण कॅम्प विषयी नवरदेवाला विचारले असता, "मी व माझे नातेवाईक कोरोना महामारीच्या संकटात सुरक्षित राहावे. याकरिता जेवणावर जास्त खर्च करण्यापेक्षा लग्नातच मोफत लसीकरणाचा कॅम्प घेतला. मी लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र, लसीचा दुसरा डोस लग्नात घ्यायचे ठरवले व माझ्या सोबत माझ्या नातेवाईकांना देखील लस द्यायचं ठरवलं. म्हणून आज लस घेतली, ज्याने करून मी व माझे नातेवाईक देखील सुरक्षित राहिले पाहिजे" असं नवरदेव प्रसाद फिरंगे यांनी सांगितले.

तर, "नव्या आयुष्याची सुरुवात करत असताना, सुरक्षित राहणं महत्त्वाचा आहे. म्हणून मी देखील आज लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. सर्वांनी लस घ्यावी." असा संदेश नवरी पूजाने दिला.

माझ्या भावाच्या लग्नसोहळ्यात लसीकरण कॅम्प घेण्याचं ठरवलं.त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश हाच होता, की ग्रामीण भागातील बरेच लोक लस घेत नाहीत. माझ्या भावाच्या लग्नात येणारे सर्व वऱ्हाडी मंडळी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे, ज्यांनी कोणी लस घेतली नाही. त्यांना लसीकरणाचा लाभ मिळावा व ते सुरक्षित व्हावेत. या हेतूने आम्ही लसीकरण काम घेतला आणि याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. असं नवरदेवाचे भाऊ गणेश फिरंगी यांनी सांगितले.

तर, फिरंगे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. असं भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले. दरम्यान, बीड जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का कमी असताना, लसीकरण व्हावे या हेतूने शासन प्रशासन जनजागृती करत आहे. याच बरोबर आता सामाजिक बांधिलकी जपत सामान्य नागरिक पुढे येऊ लागल्याने, लसीकरणाला वेग येईल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT