barshi to delhi cycling demanding maratha reservation saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील युवकाची सायकलवरुन दिल्ली यात्रा (पाहा व्हिडिओ)

दिल्लीत पाेहचण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागेल असे मराठा युवकांनी नमूद केले.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बार्शीतील एका मराठा बांधवाने बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला (barshi to delhi bicycle yatra सुरुवात केली आहे. आज (गुरुवार) बंडू लोकरे (bandu lokre) यांनी त्यांच्या यात्रेस प्रारंभ केला. विविध मान्यवरांसह पंतप्रधान यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी करणार असल्याचे लाेकरे यांनी साम टीव्हीशी बाेलतान नमूद केले. (Maharashtra News)

मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा सुरू केली आहे. बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेची सुरुवात केली आहे.

या सायकलवर दोन्ही बाजूने मराठा आरक्षणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ते दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा बांधवांकडून बंडू लोकरे याचे जोरदार स्वागत करून बार्शी ते दिल्लीपर्यंत त्याच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत. बार्शी ते दिल्ली हा साधारण सोळाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून लोकरे करणार आहेत. त्यासाठी त्यांना 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT