bacchu kadu slams central govt for imposing export duty on onions Saam Tv
महाराष्ट्र

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीवर सरकारने तोडगा काढा, अन्यथा...; बच्चू कडूंचा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

आज कांद्याला साधारण 1800 ते 2200 रुपये दर मिळाल्याचे सांगितले गेले.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे / विश्वभूषण लिमये

Onion Export Ban :

सध्या कांद्यावर निर्यात बंदी केली असून ती उठवावी तसेच द्राक्षाचे ज्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यावर नक्कीच सरकारने तोडगा काढावा अशी मागणी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली आहे. नाशिक येथील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे झालेल्या द्राक्ष व कांदा परिषद शेतकरी मेळाल्यात आमदार कडू बाेलत हाेते. दरम्यान सरकारने ताेडगा काढला नाही तर द्राक्ष व कांदयासाठी लवकरच आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला. (Maharashtra News)

सोलापूरात कांदा लिलाव शिस्तबद्ध सुरु

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलावमध्ये झालेल्या गोंधळानंतर आज (साेमवार) पुन्हा बाजार सुरु झाला. कांद्याच्या लिलाव करिता बाजार समितीचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या बाजारात आता केवळ 600 ट्रक कांदा लिलावसाठी सोडला जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान उर्वरित कांदा गाडयांना दुसऱ्या दिवशीच्या लिलावसाठी टोकन नंबर देऊन पार्किंगमध्ये थांबवले जाणार आहे. बाजारात लिलाव झालेला कांदा बाहेर पडल्याशिवाय बाहेरील गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाहीत.

सोलापूर बाजार समितीच्या नवीन नियमामुळे बाजारात आज कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही. शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात लिलाव सुरु झाला. आज कांद्याचे दर देखील स्थिर असल्याचे निदर्शानास आले. आज कांद्याला साधारण 1800 ते 2200 रुपये दर मिळाल्याचे सांगितले गेले.

लासलगावत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाजवळ गोरख संत या तरुण शेतकऱ्याने गेल्या आठवड्यापासून निर्यातबंदी उठत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्यास पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव घोषणाबाजी करत बंद पाडले तसेच बाजार समिती बाहेरील गेट जवळ ठिय्या मांडला. यावेळी छावा संघटनेचे करण गायकर यांनीही आपला पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.

सरकारने निर्यात बंदी उठवली नाही तर अन्न त्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा उपाेषणकर्ते गोरख संत यांनी दिला आहे. येणाऱ्या काळात निर्णय झाला नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT