Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर तुम्ही कोणती कार चालवताय? RTO ने केले सावध

जुनी वाहने वेगाने चालवल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : समृद्धी महामार्गामुळे वेगाने प्रवास पूर्ण होत आहे. मात्र महामार्ग सुरु झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांची दखल आता वाहतूक विभागाने घेतली आहे.  समृद्धी मार्गावरून जुन्या फोर व्हीलर कार वेगात पळवू नका, असा सल्ला औरंगाबादच्या आरटीओने दिला आहे.

औरंगाबाद आरटीओ अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करून अपघात घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत काम सुरू केले आहे. समृद्धी महामार्गावर अगदी जुनाट फोर व्हीलरदेखील १२० किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक वेगाने चालवल्या जात आहेत. परंतु जुनी वाहने इतक्या वेगाने चालवल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. (Latest Marathi News)

त्याबरोबर टायर गरम होऊन फुटण्याची भीती असते. अशावेळी टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरणे फायद्याचे ठरू शकते, असे निरीक्षण आरटीओ अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. समृद्धी महामार्गामुळे प्रवास गतीने होत आहे. परंतु, या रस्त्यावरील अपघातांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहे.

आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघातांना आमंत्रण मिळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महामार्गावर प्रवास करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला अधिकाऱ्यांनीवाहनचालकांना दिला आहे.

समृद्धी महामार्गावरील इंटर चेंजवर फलकाच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये मोठं घबाड, SIT च्या हाती लागले महत्वाचे पुरावे, VIDEO

Maharashtra Live News Update: बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ हवामानसह मेघगर्जना

Shocking : बाई, काय हा प्रकार... पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी तरुणाने देवीला घातलं साकडं; नवस पूर्ण होताच काय केलं? वाचा

Maharashtra Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन; कारण आलं समोर

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका; नाशिकमध्ये गहू पिकाचे मोठे नुकसान|VIDEO

SCROLL FOR NEXT