Aurangabad Rain
Aurangabad Rain Saam TV
महाराष्ट्र

स्मशानभूमी नाही म्हणून नदीपात्रात चिता पेटवली अन् नदीला पूर आल्याने सगळंच बिनसलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया -

औरंगाबाद : राज्यभरात परतीचे पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, तर शेतकऱ्यांचे ऐन काढणीला आलेली पिकं पावसामुळे मातीमोल झाली आहेत. या पावसाचा (Heavy Rain) फटका सर्वांनाच बसला आहे. (Aurangabad)

मात्र, एका मृतदेहाची देखील पावसामुळे हेळसांड झाल्याची घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील (Kannada Taluka) आमदाबाद येथील एका महिलेचे निधन झाले. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदीपात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. परंतु, काही वेळातच नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्याची घटना काल घडली.

पाहा व्हिडीओ -

कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथे स्वतंत्र स्मशानभूमी नाही. गावाशेजारील अंजना नदीच्या पात्रालगतच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र, मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने मृतदेह अखेर पुर्णपणे जळला गेला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT