Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange-Patil: विधानसभेचा प्लान फिस्कटला? मनोज जरांगेंचं ठरलं मग कुठं बिनसलं?

Assembly Election: विधानसभा निवडणुका लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपली रणनीती बदलल्याचं सांगितलं जात आहे.

Tanmay Tillu

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा लढवण्याबाबतचा 29 ऑगस्टला होणारा निर्णय आता पुढे ढकललाय. विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदलल्याचं बोललं जातंय. मात्र जरागेंनी नेमकं कशामुळे घोषणा लांबणीवर टाकली? नेमकं काही बिनसलं की जरांगेंची यामागे गुप्त रणनीती आहे, यावरचा हा रिपोर्ट.

सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदललीय. विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते..मात्र सरकारनं निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढं ढकलावी लागली असं म्हणत जरांगेंनी सरकारवर खापर फोडलंय.

महाराष्ट्रातील पाऊस आणि सणांमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेणार असल्याचं निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी म्हटलं होतं. एकीकडे सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केलीये. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच जरांगेंनी एक पाऊल मागे येत 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलली आहे.

त्यामुळे जेव्हा निवडणुकीची तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ असं म्हणत जरांगेंनी आपला प्लान पुढे ढकललाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होतेय. त्यामुळे निवडणुका कधीही झाल्या तरी जरांगेंचं आव्हान सरकार समोर असणार एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT