Ashadhi Wari Toll Free
Ashadhi Wari Toll Free Saam TV
महाराष्ट्र

Ashadhi Wari Toll Free : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोड बातमी; राज्य सरकारने घेतला टोलमाफीचा निर्णय

Satish Daud

Ashadhi Wari Toll Free : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोड बातमी आहे. राज्य सरकारने वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी माफ असणार आहेत. ३ जुलैपासून ते २१ जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

यासंदर्भात राज्य सरकाच्या वतीने जीआर देखील काढण्यात आला आहे. अक्षय महाराज भोसले यांनी देखील या टोलमाफीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. पथकर नाक्यावर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

पोलीस आणि परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती आवश्यकतेप्रमाणे जाहीर करावी. या सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्देशनात आणाव्यात असंही जीआरमध्ये म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

वजन वाढवायचंय? असं एका महिन्यात वाढवा तुमचं Weight

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

Teacher's Recruitment Special Report: ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकांची भरती

Schools Closed Tomorrow: मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

SCROLL FOR NEXT