Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यात पनोरी- जणोरी गावाचा संपर्क तुटलाल नदीच्या पुरात पर्यायी रस्ता गेला वाहून

Akola News : अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे वाढ झाली. त्यामुळे नदीला पुर आला आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : सातपुडा पर्वत रांगेत पडत असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर आला आहे. नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील पनोरी व जणोरी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने पर्यायी तयार करण्यात आलेला रस्ता पुरात वाहून गेला आहे. 

अकोल्याच्या (Akola) अकोट तालुक्यातील पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे वाढ झाली. त्यामुळे नदीला पुर आला आहे. त्यात पणोरी आणि जणोरी गावाच्या रस्त्यावरील पठार नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. म्हणून गावकऱ्यांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्या बांधण्यात आला आहे. पण सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर (Flood) आला आणि पर्यायी रस्ता वाहून गेला. सद्यस्थितीत दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे. 

मागील काही माहिन्यांपासून अकोट तालुक्यातील पठार नदीवरील नव्याने बांधकाम सुरू असलेले पुलाचे काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने काम सुरु असल्याने पर्यायी उभरण्यात आला. पण आता हा पर्यायी पुल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मध्यरात्रीपासून मुख्य गावांशी संपर्क बंद आहे. काही नागरिक जीव मुठीत घेऊन पुरांच्या पाण्यातून येण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT