Ajit Pawar in Vaijapur
Ajit Pawar in Vaijapur saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: ...तर सरकार पडेल, वैजापुरात बोलताना अजित पवार यांचा दावा

Chandrakant Jagtap

Ajit Pawar in Vaijapur : विरोधी पक्षनेते अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वैजापूर येथे बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्यात सरकार विरोधात लोकांमध्ये असलेली मोठ्या प्रमाणात चीड दिसली, त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही.

अजित पवार म्हणाले की, 40 आमदारांना सांभळण्यात सरकारचं सगळं दुर्लक्ष होत आहे. यांना सांभाळाव‌ लागत असल्यामुळे दुसरी कामे करता येत नाहीत. यातील एकही इकडे-तिकडे गेला की सरकार पडेल, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

पुढे बोलताना अजित पवारांनी शिंदे गटावर निशाणा साधला, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आलेल्यांनी त्यांच्याच मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपने देखील महत्वाची भूमिका बजावली. राज्यातील सध्याच्या राजकर्त्यांनी महापुरुषांच्या विचारांना तिलांजली दिली असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

"40 आमदारांना सुरक्षा कशाला पाहिजे?"

या 40 आमदारांना सुरक्षा कशाला पाहिजे? एका आमदाराला महिनाभर वाय प्लस सुरक्षा द्यायला 20 लाख रुपये खर्च येतो. पत्रकारांवर हल्ले होतात, आदित्य ठाकरे, प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ले होतात तेव्हा तुम्ही काय करता? कायदा सर्वांना समान आहे. सरकारमधील आमदार कोणालाही मारतात, काही भाषणात सांगतात चुन चुन के मारुंगा, ही कोणती पद्धत आहे? अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

"शिंदे सरकारने महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं"

महागाई आणि बेरोजगारी यावर कोणी काही बोलत नाही. मोठे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले यावर कोणी बोलत नाही? तुम्ही लोकांचं भल करायला मुख्यमंत्री झालात की प्रकल्प राज्याबाहेर घालवायला मुख्यमंत्री झालात? असा सवाल यावेळी अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना केला. महाविकास आघाडी सरकारने मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणले. परंतु या घटनाबाह्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

"यांचा पायगुण बघा"

राज्य सरकारवर टिका करताना अजित पवार म्हणाले, यांचा पायगुण बघा, हे सरकार आलं आणि शेतमालाचे भाव पडले. यांनी सरकारमध्ये आल्यावर सांगितले आम्ही दिवसा लाईट देऊ, अरे इथे आहे ती लाईट तोडताय अन् कुठ दिवसा लाईट देता, असा टोला अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

"एकही महिला मंत्री नाही"

हे लोक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. कारण सगळं यांच्या हातात पाहिजे. या सरकारमध्ये 20 मंत्री आहेत, पण एकही महिला मंत्री नाही. महिलांनो तुम्ही ठरवा यांना दाखवा महिलांनी मनात आणल्यावर काय होतं? असे पवार म्हणाले.

"45 कोटी जाहिरातीवर खर्च केले"

केंद्र सरकारने मुठभर उद्योजकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ केले, मग शेतकऱ्यांचे का जमत नाही? एक वर्ष झालं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. पैठणला लोक सांगत होती टक्केवारी दिल्याशिवाय काम मिळत नाही. लोकशाहीला तिलांजली देण्याच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. रोज तीन ते चार आत्महत्या करत आहेत, हा सरकारचा नाकर्तेपणा नाही का? याला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

"सामान्य माणसाने कुणाकडे जावं?"

गेल्या महिन्यात औरंगाबादेत सहायक पोलीस आयुक्त महिलांच्या घरी जाऊन विनयभंग करतात. रक्षकच भक्षक झाले तर सामान्य माणसाने कुणाकडे जावं? जे घडलं तेच मी सांगतो, मी विरोधाला विरोध करणारा नाही. शेतकऱ्यांचा पिकविमा मिळत नाही, त्यांनी कुणाकडे बघायचं? असे पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair care Tips: केसांना एलोवेरा जेल कधी लावावे?

Relationship Tips: बॉयफ्रेंडचं असं वागणं म्हणजे ब्रेकअपचे संकेत; तुटण्याआधी वाचवा नातं

IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

Thane Railway Station Fire : ठाणे रेल्वे स्टेशनवर जाहिरात फलकाला आग

BJP Vs RJD: ब्रेकिंग! बिहारमध्ये भाजप- आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जखमी; इंटरनेट सेवा बंद

SCROLL FOR NEXT