Ladki Bahin Yojana yandex
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना चुनावी जुमलाच का? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाने लाभार्थ्यांना प्रश्न

Manikrao Kokate On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे शेती कामासाठी महिला मिळत नाहीत. या प्रश्नावर सर्वच कामांसाठी लाडक्या बहिणीवर का अवलंबून राहता, असं कृषीमंत्री म्हणालेत.

Bharat Jadhav

लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यातून पैसे परत जात आहेत. धुळ्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यातील 5 हप्त्यांचे साडेसात हजार रुपये सरकारनेच काढून घेतल्याचं समोर आलं. अशातच कृषीमंत्री यांनी योजनेसंदर्भात मोठं विधान केलंय. पुण्यातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या विधानामुळे विरोधक सरकारला धारेवर धरतील असं म्हटलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणांना खूश करत २१०० रुपये देण्याचं वचन दिलं होत. पण निवडणूक होताच सरकारने निकष कडक करणार असल्याचं म्हटलं. जे अर्जदार या निकषात बसणार नाहीत त्यांचा अर्ज बाद केला जाणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. त्यानंतर आता धुळ्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यातून सरकारने पैसे काढून घेतले. अशात कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत विधान केलंय. त्यांच्या विधानामुळे ही योजनाही चुनावी जुमला होता का असा सवाल केला जात आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले, ⁠नियमाप्रमाणे दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे तो निर्णय महिलांनी घ्यायचाय. त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा. लाडकी बहीण योजनेचा घ्यायचा की पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा. हे त्यांनी ठरवायचे आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला शेती कामाला येत नसल्यानं मजुरांचा प्रश्न निर्माण झालाय. त्यावर बोलतांना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, सर्वच कामांसाठी लाडक्या बहिणींवर का अवलंबून राहावं.

पण आम्हाला निवडणुकीला त्यांची गरज होती, असं विधान केलंय. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान आज काही लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेले पैसे परत सरकारने काढून घेतले आहेत. त्यामुळे ही योजनाही चुनावी जुमला ठरली का? असा सवाल केला जात आहे. पीक विमा घोटाळ्याबाबत कर्जमाफीवर बोलताना कृषीमंत्री म्हणाले, कर्जमाफी हा विषय सहकार विभागाकडे येतो. कृषी खात्याकडे येत नाही. पण यावर माहिती मागवण्याचे काम सुरू आहे.

राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरी झाली की, चार- सहा महिन्यात त्यावर निर्णय होईल. तर पिकविमा घोटाळ्यावर मुख्यमंत्री यांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या स्तरावर चौकशी सुरू आहे. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल कृषी खातं देखील याची माहिती घेईल. तसेच कृषी विभागाच्या इतर योजनांबाबत तक्रार आल्यास चौकशी केली जाईल. दरम्यान पीक घोटळ्यासंदर्भात सुरेश धस यांनी प्रश्न केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT