Manoj Jarange Patil, Laxman Hake Saam TV
महाराष्ट्र

मनोज जरांगेंनंतर आता 'या' नेत्याची मैदानात उडी! १ सप्टेंबरला 'चलो मुंबई'ची घोषणा, राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार

Manoj Jarange Patil, Laxman Hake : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबरला ‘चलो मुंबई’ची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षण आणि संविधानाच्या रक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil latest news : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा सरकारला इशारा दिला. त्यानंतर ओबीसीसाठी लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका करत १ सप्टेंबर रोजी चलो मुंबईचा नारा दिला आहे. जरांगे आणि हाके हे दोन्ही नेते एकाचवेळी मुंबईत आंदोलनाला येणार असल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे. सरकारकडून आता काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

आम्ही आरक्षणाच्या चौकटीतील सर्व समाजबांधवांना आवाहन करत आहोत. आरक्षण आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांनी १ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने मुंबईत यावे, असे थेट आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे, ती जरांगे यांना स्वतःला तरी मान्य आहे का? जर हा प्रस्थापित समाज ओबीसी आरक्षणात आला, तर आधीच मागास असलेला ओबीसी समाज टिकेल का? तो या शासनकर्त्या वर्गाशी स्पर्धा करू शकेल का? याने सामाजिक न्याय होईल का? याचे उत्तर अभिजीत दीपके यांनी मनोज जरांगे यांना विचारले पाहिजे, असा घणाघाती सवाल हाके यांनी केला.

ओबीसी समाज आज संकटात आहे आणि एससी-एसटी समाजाला अडचणीत आणण्याचे षड्यंत्र या देशात अन् राज्यात सुरू आहे. मुक्या-बधिरांचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही १ सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने कूच करत आहोत, असे हाके म्हणाले. मराठवाड्यासह सह इतर सर्व भागांतील ओबीसी बांधव दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर एकत्र येणार आहेत. तेथूनच मुंबईच्या दिशेने ऐतिहासिक रॅलीचा प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

आमच्या आरक्षणाच्या मुळावर जर कोणी येत असेल, तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल. वतनदारांनी, जहागीरदारांनी, स्वतःला संस्थांनिक म्हणवणाऱ्यांनी आणि वेगवेगळ्या राजघराण्यांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्यांनी आमच्या ओबीसींचे आरक्षण मारण्याचा प्रयत्न केला आहे. या 'जातचोरांना' जाब विचारण्यासाठीच आम्ही १ सप्टेंबरला मुंबईला जात आहोत, असेही हाके म्हणाले.

जरांगे पाटील आणि आरक्षण तज्ज्ञांवर टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना हाके म्हणाले, कोणीही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे तज्ज्ञ असू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे साडेसहाशे पानांचे जजमेंट आहे, ज्यामध्ये न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे स्पष्ट जजमेंट आहे. ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षण हे कोणासाठी आहे, हे सर्वांना माहीत आहे.

अभिजीत दीपके यांच्या आंदोलनावर बोलताना हाके म्हणाले, अभिजीत दीपके तुम्ही आंदोलन करत आहात, आम्ही तुमचे स्वागतच करतो. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा होता. परंतु जर कोणी आरक्षणाच्या आणि संविधानाच्या आड येत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. अभिजीत हा नवीन मुलगा आहे. आम्ही आरक्षण, संविधान वाचवण्यासाठी तसेच दीनदलित आणि भटके-विमुक्त समाजाच्या हक्कांची लढाई लढत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

माझ्या, चिमण्यांनो! मुलींची माफी मागत ASI पोलीस अधिकाऱ्यानं जीवन संपवलं; लॉजमध्ये आढळला मृतदेह, नवी मुंबई पोलीस दलात खळबळ

Healthy Kidneys : किडनी निरोगी ठेवायची असेल तर रोज खा हे 7 पदार्थ

एकाच स्कुटीवर 5 जण, पोलिसांची नजर पडली! हुल्लडबाज चालक थेट पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT