चारही आरोपीची ओळख पटवली
कोंढवा खून प्रकरणात आरोपी निश्चित
चारही आरोपी हत्या केल्यानंतर एका गाडीवर बोपदेव घाट दिशेने गेले होते.
हत्या केल्यानंतर गाडी हत्या झालेल्या ठिकाणी सोडून गेले होते.
प्राथमिक कारण हत्या गॅंगवर मधूनच पोलिसाची माहिती
ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीने पोलिस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचा इशारा देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वेळ आली तर लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही देखील हातात दंडुका घेऊ,अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
तीन नोव्हेंबर रोजी मुंबईतून नियोजित केलेल्या अतिवृष्टी गाव आणि शिवाराची पाहणी करणार
अतिवृष्टी ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणची माहिती राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी देण्याची सूचना
पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दौंड शहरातील अहिल्यानगर मार्गावरील लोखंडे वस्ती परिसरात मध्यरात्री दुहेरी दरोड्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम पाच तोळे सोन्याचे दागिने यासह चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केले.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होत वाशिम शहरासह मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कापसाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. तर ढगाळ वातावरणामुळे तुरीला फटका बसण्याची शक्यता आहे.
साताऱ्यातील फलटण येथील व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुळगाव असलेल्या कवडगाव मध्ये दाखल झाले आहेत कुटुंबियांसोबत मनोज जरांगे पाटील संवाद साधत आहेत प्रकरणासंदर्भात विचारपूस करताना म्हणून जरांगे पाटील आणि डॉक्टर निर्भय यांचे कुटुंबीय.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे, शेतकऱ्यांच पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस आता काळवंडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे,
बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जरांगे पाटील हे आज पीडित कुटुंबीयांना सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.. आता या भेटीकडे सबंध राज्याचे लक्ष लागला आहे.
ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.. आज पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली... या बैठकीत कारखानदार जाहीर करत असलेला 3400 रुपयांचा दर मान्य नसल्याचे सांगत सोमवार पर्यंत जिल्हा प्रशासनाने कारखानदार आणि संघटनांची बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी केली आहे...
बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जरांगे पाटील हे आज पीडित कुटुंबीयांना सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.. आता या भेटीकडे सबंध राज्याचे लक्ष लागला आहे.
आज महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे. महाविकास आघाडी आणि मनसे पक्षातील नेत्यांनी मुंबईत सभा घेतली आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे.
निकालानंतर सत्ताधारीही अवाक.
सगळी कारस्थानं आयोगाकडून सुरू.
मतदारांच्या मतांचा अपमान सुरू.
घराघरात जा, चेहरे कळले पाहिजे. - राज ठाकरे
बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जरांगे पाटील हे आज पीडित कुटुंबीयांना सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.. आता या भेटीकडे सबंध राज्याचे लक्ष लागला आहे..
नाशिक जिल्ह्याला आज हवामान विभागाने दुपार नंतर पावसाचा अलर्ट दिला असताना मनमाड सह परिसरात दुपारी जोरदार पावसाने काही वेळ जोरदार हजेरी लावली,सकाळ पासून मध्येच कडक ऊन तर मध्येच ढगाळ वातावरण असताना दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्याने बळी राजा मात्र चांगलाच धास्तावला असून,आधीच मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने कांदा, मका खराब झालेली असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मुंबईतील सत्याच्या मोर्चाच्या ठिकाणी मनसे युवा सेना प्रमुख अमित ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार अनिल देसाई आणि मनसे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई हे दाखल झाले आहेत. मोर्चाच्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई पोलिसांकडून सर्व्हेलन्स वॅन तैनात
मुंबई महापालैकेच्या इथे उभारण्यात आलेल्या स्टेज जवळ ही वॅन तैनात
मोबाईल सर्व्हेलन्स वॅन वर ६ सी सी टिव्ही कार्यरत
मुंबईत होणाऱ्या मोर्चाचे प्रत्येक गोष्टीवर वॅन मधून ठेवण्यात येणार नजर
फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना न्यायालयीन कोठडी...आज दोघांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात केलं गेलं होते हजर
सत्याचा मोर्चा मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखवणार खोट्या मत पत्रिका?
सत्याच्या मोर्चा सभेच्या जवळ एका ठिकाणी बोगस मत पत्रिका झाकून ठेवल्या?
राज ठाकरे सभेत दाखवणार या बोगस मतपत्रिका?
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मेट्रो चौकात पोहोचले
आज चर्चगेट परिसरात महाविकासआघाडीचा सत्याचा मोर्चा
उद्धव ठाकरे आणि आदिती ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले
आझाद मैदान येथे महाविकास आघाडीकडून सत्य मोर्चाचा आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी चर्चगेट रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत.पालघर मधून ही मनसे आणि ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत
महाविकास आघाडीच्या मोर्चाला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते समुद्र मार्गाने मुंबई दाखल
शेकडोच्या संख्येने शेकाप चे कार्यकर्ते मुंबईच्या गेटवे या ठिकाणी दाखल झाले आहेत.
घोषणाबाजी करत कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणी जाणार आहेत
महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चासाठी विविध ठिकाणाहून शेकाप चे कार्यकर्ते मुंबईच्या गेटवे या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे.
पुण्यात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे
बिबवेवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड
रात्री दीड वाजता बिबवेवाडी गावठाण येथे तीन कार व दोन पॅगो रिक्षा याची तोडफोड करण्यात आली आहे.
बिबवेवाडी पोलीस स्टेशन तपास करत आहेत.
शनिवार आणि रविवार ची सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणात मुंबई करून पुण्याच्या दिशेने आणि पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारे पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने बाहेर पडल्यामुळे वडगाव फाट्यावर ट्राफिक कोंडी झाली आहे. दरम्यान रोजच या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याच चौकामध्ये काही दिवसांपूर्वी एका टॅंकरने पोलिसाला उडवले होते त्या पोलिसांचा जागीच मृत्यू झाला होता.
महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चासाठी वसई विरार मधून शेकडो कार्यकर्ते मुंबईसाठी लोकलने रवाना झाले आहेत. मत चोरी करून सत्तेत आलेल्या सरकारला बाहेर काढा, संविधान, लोकशाही वाचवा ह्या घोषणा देत मनसे कार्यकर्ते मोर्चासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पुण्यातील शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल
संबळ वाजवत आंदोलनात सहभागी
सत्याचा मोर्चामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक होणार सहभागी
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्तांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. या धरणग्रस्ताने अनेक वेळा आंदोलने केली. परंतु त्यांच्या मागण्या अद्याप तरी पूर्ण झाल्या नाहीत. पुन्हा याच मागण्यांसाठी मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील शेख जैनुद्दीन यांनी रावणगाव ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉन्ग मार्च काढला आहे. आज शेख जैनुद्दीन हे रावणगाव येथून पायी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईला जाण्याअगोदर शासनाने धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शिवसेना ठाकरे गायच्या रेखा कोंडे यांच्यासह ठाकरे गटाच्या १० ते १२ महिला पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल
नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला रेखा कोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
परवानगी नसताना रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर पुणे पोलिसांची कारवाई
काल दुपारी रेखा कोंडे आणि इतर शिवसैनिक महिलांनी रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर केलं होतं आंदोलन
अधिक तपास पोलिस करत आहे
मुंबईतील सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मनसैनिक मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकाकडे येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईच्या चारकोप विधानसभा क्षेत्रातील मनसैनिकांकडून देखील यासाठी तयारी करण्यात आली असून शेकडो मनसैनिक ढोल ताशा वाजवत आता रेल्वेने सीएसएमटीकडे निघाले आहेत
आज दुपारी चर्चगेट येथे मोर्चा होणार आहे. यासाठी राज ठाकरे जाणार आहे. राज ठाकरे यासाठी लोकलने प्रवास करणार आहेत.
पंढरपूरच्या कार्तिकी वारीला यंदा अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसलेला दिसून येतोय. कायम सहा ते सात लाखांवर अधिक भरणारी कार्तिकी वारी यंदा मात्र गर्दी विना असलेली दिसून येत आहे. उद्या रविवारी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे. याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापूजेसाठी आज पंढरपुरात दाखल होतील. मात्र तत्पूर्वीच मंदिर परिसर आणि पंढरपूर शहरात भाविकांची गर्दी कमी असल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील विठ्ठलाच्या दर्शनास दहा तासांचा कालावधी लागतो आहे. आज जरी गर्दी कमी असली. तरी उद्याच्या एकादशीला अधिकची गर्दी होऊ शकते.
हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नाफेड मार्फत कालपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालीये. मात्र पूर्वी कुठूनही ऑनलाइन नोंदणी करण्याची पद्धत बदलून आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर येऊन नोंदणी करावी लागत असल्याने नाफेडच्या नोंदणी सकाळपासून केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झालीये, वृद्ध, आणि महिलांना लहान बाळांसह नोंदणीसाठी यावं लागत असल्यानं ही नोंदणी ऑफलाइन पद्धतीनं सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय
बदलापूर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याचं 15 दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आलं. मात्र उद्घाटनानंतर अवघे 3 दिवचचं हे सरकते जिने सुरू राहिले. त्यामुळ रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या सरकत्या जिन्याला श्रद्धांजली वाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं. तसेच यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत जाबही विचारला. तसच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लावण्यात आलेल्या संरक्षण जाळ्या लवकरात लवकर काढून टाकाव्यात अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईहून गुजरात दिशेने निघालेल्या धावत्या ट्रकला भीषण आग लागली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या मेंढवन जवळ ही दुर्घटना घडली. इंजिन गरम झाल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करताच आगीचा भडका उडाला. सुदैवाने चालक सुखरूप. मात्र या भीषण आगीत ट्रक जळून खाक झला.
निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा मोर्चेचा आयोजन मुंबईत करण्यात आला आहे मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये उतरणार आहेत त्यामुळे मोर्चेकरी लोकलने प्रवास करत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे कोणत्याही प्रकारे लोकलचं नुकसान होऊ नये या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दीडशेपेक्षा पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत तसेच 300 पेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे आणि काही पोलीस वर्दीतले तर काही पोशाखातले पोलीस असणार आहेत याचाच आढावा घेतला आहे
धाराशिव शहरातील ₹140 कोटी निधीवरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही.या कामामुळे महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. शिवसेना आणि भाजप आमने-सामने आलेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी या कामांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप केले आहेत.तर जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी महायुतीत भाजप शिवसेनेला विचारात घेत नसल्याचा आरोप करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा जाहीर निषेध केला. त्यामुळे महायुतीतला वाद वाढण्याची चिन्ह आहेत.
धाराशिव तालुक्यातील ढोकी हद्दीतील गोवर्धनवाडी परीसरातुन ॲल्युमिनीयमची तार चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन वाहनासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अब्दुल जोहर शेख अस पकडलेल्या संशयीत चोरट्याचे नाव आहे.पोलिस कळंब परीसरात गस्त घालत असताना चोरट्याची माहीती मिळाली असता पोलिसांनी छापा टाकला असता पाच किलोमीटर लांबीची तार व वाहन जप्त करण्यात आले असुन आरोपी ढोकी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
मतदार यादी मधील घोळ विरोधकांनी पुढे आणल्यानंतर आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसचे नेते विजय वद्देतीवार खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीच्या रेखा जाधव असे अनेक नेते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणारा मोर्चा महापालिका मुख्यालयासमोर समाप्त होणार आहे. या मोर्चाची पूर्ण तयारी झाली आहे मात्र अद्यापही मुंबई पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी दिली जरी नसली तरी विरोधक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत
महाविकास आघाडी कडून मत चोरी आणि निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ सत्याच्या मोर्चाच आयोजन करण्यात आल्याने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रेल्वेने चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये दाखल . कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता चर्चगेट रेल्वे स्थानकावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात.
भंडारा जिल्ह्यात निसर्गाने प्रलय ओतला आहे. दिवाळीनंतरही पावसाने थैमान घातले असून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. परिपक्व झालेले धान बांधात पाण्यात भिजले असून धानाचा कडपाला अंकुर फुटले आहेत. हे धान वाचवणे अथवा कोरडे करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे चित्र आहे.उभे पीक पाण्याखाली गेले असून, चिखलात अडकलेल्या पिकाची कापणी करणेही शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी-तीहेरी संकट कोसळले आहे. यामुळे पाच महिन्यांची मेहनत, कर्जाचा भार आणि कुटुंबाचा घाम एका झटक्यात वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचला असून, हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत धाराशिव जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकरी बाधित झाले,मात्र आतापर्यंत फक्त 90 हजार शेतकऱ्यांनाच अनुदान मिळालं आहे.जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी 223 कोटींचं अनुदान प्राप्त झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.अतिवृष्टीने बाधित झालेल्या दोन लाख 30 हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे.उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अनुदान वितरित केलं जाणार आहे.
राज्य सरकारकडे पैसे थकल्यानंतर 17 मुलांना ओलिस ठेवल्यानंतर एन्काऊंटर (Rohit Arya Encounter) झालेल्या रोहित आर्यचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रोहित आर्यचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी रोहित आर्यच्या कुटुंबातील एक व्यक्ती शवविच्छेदन कक्षबाहेर उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय गुन्हे शाखेचे पोलिसही त्या ठिकाणी उपस्थित होते.
रोहित आर्यचे संपूर्ण शवविच्छेदन हे व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच हा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूबाबत पुढील गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोहित आर्यचा एन्काऊंटर हा बनावट होता की रियल होता हेदेखील स्पष्ट होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला (Sikandar shaikh) पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासातून समोर आला आहे. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस (Police) तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीला तर, दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू होणार आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांच्या निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे. यात रब्बी हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचाही समावेश आहे. या मदतीचे चार शासननिर्णय आज प्रसिद्ध करण्यात आले. आजपर्यंत शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ११ हजार ५९३ कोटी ९४ लाख रुपयांचे वितरण केले आहे.
महसूल यंत्रणेकडून पीक परिस्थितीचा अंदाज घेऊन पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली असून तीन टप्प्यात जाहीर होणाऱ्या या पीक पैसेवारीमध्ये सुधारित पैसेवारी जाहीर करताना यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे मान्य केले आहे.जिल्हा प्रशासनाने सुधारित पैसेवारी जाहीर केली असून जिल्ह्यातील 2046 गावांची पैसेवारी जाहीर करताना पीक परिस्थितीचा अंदाज घेऊन महसूल यंत्रणेत सुधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार जिल्ह्याची पैसेवारी 48 टक्क्यापर्यंत खाली आली आहे.
मुंबईतील आझाद मैदान येथे महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी पालघर मधून मनसैनिक तुलसी जोशी सह कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
राज ठाकरे यांची सभा असो वा आंदोलने तुलसी जोशी यांचा नेहमी चलचित्र मार्फत हटके आणि वेगळापण दाखवण्याचा प्रयत्न
मानवी चलचित्राच्या माध्यमातन पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दाखविण्याचा प्रयत्न
मतचोरी करणाऱ्या सरकारविरोधात ठाकरे बंधूकडून चाबकाने मारत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.