Ramdas Athawale Saam Digital
लोकसभा २०२४

Ramdas Athawale : भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवलेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

Lok Sabha Election 2024 : भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे ते बोलत होते.

Sandeep Gawade

संविधान वाचवणे आणि मजबूत करणे ही भाजपची भूमिका राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची भूमिका आहे. मात्र भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

भाजपने देशात ४०० पारचा नारा देत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा या निवडणुकीत प्रचार सुरू केला आहे. त्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांना संविधान बलण्यासाठीच ४०० जागा हव्या आहेत, असा विरोधकांचा दावा आहे. त्यावरून आज रामदास अठवले यांनी भाजप संविधान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र विरोध जाणिवपूर्वक खोटा प्राचार करत असल्याचा आरोप केला.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही सुद्धा भाजप आणि नरेंद्र मोदींची भूमिका आहे. भाजपचा आरक्षण किंवा लोकशाहीचा विरोध नाही परंतु विरोधक जाणिव पूर्वक भाजपच्या विरोधात खोटा प्रचार केला जातोय. तरीही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला किमान 40 जागा मिळतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT