Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांचा दिवसेंदिवस हट्टीपणा वाढतोय? स्वार्थी अन् भावनाशून्य करतात पालकांच्या 'या' गंभीर चुका

Child Selfish Behavior : पालक मुलांचे पहिले गुरु असल्यामुळे मुलं पालकांचे वेळोवेळी अनुकरण करत असतात. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर आपली वर्तणूक चांगली ठेवावी. नाहीतर मुलं स्वार्थी, भावनाशून्य आणि हट्टी होतात.

Shreya Maskar

लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पालकांनी मुलांना वेळ देणे महत्त्वाचे आहे. कारण लहान वयात मुलांकडे दुर्लक्ष केल्यास मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो आणि मुलं भावनाशून्य होतात. मुलांचे भविष्य धोक्यात येते. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर चांगला आदर्श ठेवाव.

पालकांनी 'या' चुका कधीच करू नये

मुलांना वेळ न देणे

आजकाल पालक आपले करिअर बनवण्याच्या नादात मुलांचे बालपण खराब करतात. लहान वयात मुलांना आपल्या पालकांचा सहवास जास्त हवा असतो. पण पालक धावपळीच्या जगात मुलांना वेळ देत नाहीत यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन ते हट्टी आणि स्वार्थी बनत जातात. लहान वयात मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर पालकांचे लक्ष असणे महत्त्वाचे असते. आपल मुलं काय करत, कुठे जात, काय पाहत यावर पालकांनी बारीक लक्ष देणे गरजेचे असते. मुलांच्या वागण्याच्या मूल्यांकन करा आणि कधी थोडा जरी बदल दिसला तर मुलांशी संवाद साधा. मुलांना नवीन कामात प्रोत्साहन करत रहा.

शिस्ती लावा

लहान वय मुलांना शिस्त लावण्याचा योग्य काळ आहे. लहान वयात मुलांना शिस्त लावली नाही तर भविष्यात त्यांच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होताना दिसतो. मुलांनी पालकांनी त्रास देऊ नये म्हणून पालक मुलांचे सर्व लाड पुरवतात. यामुळे मुलांना वाईट सवय लागते. ज्यामुळे मुलं बेशिस्त होत जातात. परिणामी भावनाशून्य होतात.

बेजबाबदारपणा

पालकांनी मुलांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये बेजबाबदारपणा दाखवू नये. मुलांची प्रत्येक गोष्टीला हजर रहावे. मग ते शाळेत पालक सभा असो वा मुलांच्या आयुष्यातील खास क्षण. तसेच पालकांनी मुलांना सांभाळण्याची जबाबदारी झटकून आपले मुलं दुसऱ्याच्या जीवावर सोडून जाऊ नये. कारण मुलं तुमचं निरीक्षण करत असतात. त्यामुळे भविष्यात ते देखील जबाबदारी घेणार नाही आणि फक्त स्वतःचा विचार करतील.

आदर भावना जपा

पालकांनी मुलांना लहान वयातच मोठ्यांचा आदर करायला शिकवा. तसेच आपल्यापेक्षा लहानांना समजून घ्यायला सांगा. सर्व लोक समान असतात. ही भावना त्यांच्या मनात लहान वयातच रुजवा. सर्वात महत्त्वाचे पालकांनी आपल्या मुलांसमोर मोठ्यांचा अनादर करू नये. कारण मुलं ते सर्व पाहत असतात.

मुलांची तुलना करू नये

आपल्या मुलांची इतर मुलांसोबत कधीच तुलना करू नये. कारण याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. याचे प्रमाण सतत वाढत राहिल्यामुळे मुलं भावनाशून्य बनतात. इतरांशी स्पर्धेमुळे मुलांवर दडपण येते. यामुळे मुलं स्वार्थी होऊ लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT