Chanakya Niti  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : वाईट काळात कळतो या तीन नात्यांचा खरेपणा, मिळतात हे संकेत !

Relationship Tips : प्रत्येक नात्याला परिक्षा ही वेळोवेळी द्यावी लागते. नातं म्हटलं की, त्यात अनेक चढ-उतार येत असतात.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti On Relationship : प्रत्येक नात्याला परिक्षा ही वेळोवेळी द्यावी लागते. नातं म्हटलं की, त्यात अनेक चढ-उतार येत असतात. अशातच आपल्या अनेक नात्यांची यात ओळख आपल्याला होत असते.

चाणक्य नीतीनुसार, माणसाच्या जीवनातील यशाचा पहिला धडा त्याच्या नातेसंबंधांपासून सुरू होतो आणि एखाद्या मोठ्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंधांना विशेष महत्त्व असते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, माणसाच्या आयुष्यात अशी तीन नाती (Relation) असतात ज्यांची खरी किंवा खोटी ओळख कठीण काळातच होते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1. बायको (Wife)

असे म्हणतात की पती-पत्नीचे नाते हे सुख-दु:खाचे असते आणि दोघेही प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, हे एक अतिशय नाजूक नाते आहे आणि ते फक्त कठीण काळातच ओळखले जाते. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा पत्नी पतीच्या सोबत सावली बनून चालते आणि प्रत्येक संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करते. अशा पत्नीसोबत राहिल्याने एखादी व्यक्ती अगदी वाईट टप्प्यावरही सहज मात करते.

2. मित्र

जगात दोन प्रकारचे मित्र (Friend) असतात, एक जे तुमच्याशी फायद्यासाठी जोडलेले असतात आणि दुसरे ते जे तुम्हाला प्रत्येक सुख-दु:खात साथ देतात. चांगला आणि खरा मित्र नेहमीच कठीण काळातच ओळखला जातो. जो मित्र वाईट काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच तुमचा खरा मित्र असतो. वाईट काळात अंतर ठेवणाऱ्या मित्रासोबतचे नाते संपवणे चांगले.

3. नोकर

आचार्य चाणक्य म्हणतात की, सेवकाची ओळख वाईट काळातच होते. वाईट वेळ आल्यावर तुमचा सेवक तुमच्या पाठीशी उभा असेल तर तो खरा सेवक आहे आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल. पण जो सेवक वाईट प्रसंगी मालकाची साथ सोडतो, त्याच्यावर आयुष्यात पुन्हा विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

SCROLL FOR NEXT