सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा सुरू झाला की, अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होतो. त्यामुळे अंगावर जीव पडण्याचा सुद्धा धोका असतो. गावात आणि शहरात देखील अनेक ठिकाणी अंगावर वीज पडून काही व्यक्तींचा मृत्यू होतो. तर काही जनावरे सुद्धा दगावताता.
पाऊस सुरू झाला की, आपण लगेच एखाद्या ठिकाणचा आसरा घेतो. यात कुणी झाडाखाली तर कुणी एखाद्या पत्र्याच्या शेडखाली जाऊन उभे राहते. मात्र या ठिकाणी सुद्धा वीज पडण्याची शक्यता असते. त्यामळे पावसाळ्यात कोणकोणत्या ठिकाणी थांबू नये आणि वीज नेमकी कुठे कुठे पडते याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
विजेचे खांब आणि पोल
आकाशाकतून जेव्हा वीज चमकते तेव्हा ती जमिनीवर असलेल्या विजेच्या खांबाकडे ओढली जाते. विजेच्या खांबावर आल्याने तेथे आपण उभे असू तर वीज थेट आपल्या अंगावर पडते. अशावेळी व्यक्तीचा जीव वाचवणे कठीण आहे.
मोठी झाडे
पावसाळ्यात व्यक्ती झाडांखाली थांबतात. किंवा गावी झाडांखाली आपले पाळीव प्राणी आणून ठेवतात. तुम्ही देखील असे करत असाल तर आजच थांबा. कारण याने तुमच्या अंगावर सुद्धा वीज पडू शकते.
नदी किंवा तलाव
पावसाळ्यात कधीच नदी किंवा तलावात थांबू नका. जेव्हा आपण नदी किंवा तलावात थांबतो तेव्हा तिथे देखील वीज पडते. वीज पाण्याकडे खेचली जाते.
टॅरेसवर फोनवर बोलणे
काही व्यक्ती टॅरेसवर उभे राहून फोनवर बोलतात. किंवा विजांचा कडकडाट सुरू असूनही बाहेर मोकळ्या जागेत रील व्हिडिओ बनवतात. अशावेळी त्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता असते.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.