Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : वयाच्या तिशीपर्यंत मुलं लग्न का करत नाहीत? पैशांसह 'ही' आहेत महत्वाची कारणे

Why Men are Marrying After 30 : लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्यामुळे अनेक मुलं वायची ३० वर्षे ओलांडली तरी लगेचच लग्नाला होकार देत नाहीत.

Ruchika Jadhav

पूर्वीच्या काळात मुलं २१ व्या वयात लग्न करत होते. कायद्यानुसार देखील लग्नासाठी मुलांचं वय २१ वर्षे असणं गरजेचं आहे. मात्र काळानुसार आता लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्यामुळे अनेक मुलं वायची ३० शी ओलांडली तरी लगेचच लग्नाला होकार देत नाहीत.

काही घरांमध्ये मुलांच्या लग्नासाठी आई-वडिलांकडून जास्त दबाव आणला जातो. ३० शी नंतर लग्न केल्याने आरोग्याच्या समस्या यासह मुलं होण्यासाठी देखील वेळ लागतो असं अनेक डॉक्टर सांगतात. त्यामुळे वयाची ३० वर्षे ओलांडण्याआधी आपल्या मुलांनी लग्न करावं असा पालकांचा अग्रह असतो. मात्र तरीही मुलं वय इतकं जास्त झालेलं असताना सुद्धा लग्न का करत नाहीत? याचीच काही कारणे जाणून घेणार आहोत.

आयुष्यात सेटल होण्याचा निर्णय

आजच्या काळात प्रत्येक मुलगा आयुष्यात आधी सेटल होण्याचा निर्णय घेतो. यामध्ये नोकरी, स्वत:चं घर, चांगला बँक बॅलेन्स या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे सर्वजण आपल्या करिअरकडे जास्त फोकस करतात. ही सर्व कामे करेपर्यंत वयाची तिशीओलांडलेली असते.

स्वत:चं आयुष्य खुलून जगणे

आपल्या आयुष्यात पार्टनर असल्यास जबाबदारी वाढते. सतत पैशांची बचत आणि बऱ्याच गोष्टींमध्ये ऍडजेस्टमेंट करावी लागते. यामुळे मुलांना त्याचं आयुष्य खुलून जगता येत नाही. त्यामुळे ते अगदी ३० वय झाले तरी लग्नाला होकार देत नाहीत.

योग्य पार्टनरचा शोध

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात योग्य पार्टनरची गरज असते. प्रत्येक मुलाला मॉर्डन आणि ट्रेडिश्नल दोन्ही गोष्टी बॅलेन्स करणारी मुलगी हवी असते. मात्र कोणत्याच व्यक्तीत आपल्याला हवे तसे सर्वच गुण नसतात. मात्र तरीही काही मुलं परफेक्ट पत्नी शोधण्यात व्यस्त राहतात. असं करताकरता त्यांचे वय ३० पर्यंत पोहचते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT