सध्या जिकडे तिकडे लोक सर्व वेळ व्यस्त असतात, तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे व्यस्त असूनही एकटेपणा जाणवते. विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे काही लोक कठीण परिस्थितीत स्वतःला खूप एकटे समजतात.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, एकाकीपणाने त्रस्त लोकांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात, लोक त्यांच्या कामाच्या बाबतीत खूप तणावाखाली असतात आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ काम (Work) केल्यामुळे, बऱ्याच वेळा लोकांना त्यांच्या कुटुंबासाठी वेळ काढता येत नाही. एकटेपणाच्या या समस्येने ग्रासलेल्या लोकांचे मानसिक आरोग्य हळूहळू बिघडू लागते.
एकटेपणाची भावना तुम्हाला आतून कमकुवत बनवते. तुमचं करिअर (Career) आणि भविष्य घडवण्यासाठी तुम्ही घरापासून दूर एका मोठ्या शहरात राहायला गेल्यावर या भावना येतात. चांगले जीवन जगण्यासाठी, लोक त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतात आणि अशा ठिकाणी येतात जिथे त्यांना मदत करण्यासाठी कोणीही नाही किंवा त्यांना कोणी ओळखत नाही.
अशा वेळी अनेकजण ऑफिसमध्ये मैत्री करण्याचा प्रयत्न करतात, पण हे मित्रही संध्याकाळी पाचपर्यंतच तुमच्यासोबत ऑफिसमध्ये राहतात. यानंतर तुम्ही पुन्हा एकटे पडता. ऑफिसमध्ये तुम्हाला जाणवणाऱ्या एकाकीपणावर मात करण्यासाठी तुम्ही येथे दिलेल्या टिप्सचा अवलंब करू शकता.
जेव्हा एकटेपणामुळे तुमच्या मनात कोणताही चुकीचा विचार येतो, तेव्हा अशा वेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा विचार करावा लागतो. तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या लोकांचाही विचार करा.
कोणत्याही नात्यावर, मैत्रीवर किंवा इतर कोणावरही विश्वास ठेवून स्वत:ला दुखावण्याऐवजी करिअरवर लक्ष केंद्रित करा.
दररोज तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला आनंद वाटतो त्यांच्याशी बोला.
सोशल मीडियावर मित्र बनवण्याऐवजी प्रत्यक्षात मैत्री करणे चांगले. तुमच्या गटात अशा लोकांना समाविष्ट करा जे जेव्हा गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी उभे राहतील
तुमच्यासारखे विचार करणाऱ्या लोकांसोबत रहा.